भारतीय कृषी क्षेत्राचे सिंहावलोकन आणि भविष्याचा वेध – भाग 1

काही पाश्चिमात्य तज्ञांनी अशी भयावह भविष्यवाणी केली होती की, लवकरच भारतात अन्नधान्याच्या कमतरतेमुळे कुपोषण, भूकबळी होतील, सर्वांगीण अराजक माजेल.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेचच 1947-48 मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कृषी क्षेत्राचे महत्त्व ओळखून डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या कुशल नियोजनातून साकारलेले ‘अधिक धान्य उगाओ’ (‘Grow More Food’) धोरण राबवलं.