14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
लातूर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 468
लातुर जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 54
लातुर जिल्ह्यातून सर्वाधीक 102 प्रश्न हे तुळजापूर मतदारसंघाचं भाजप आमदार जगजितसिंग राणा पाटील यांनी उपस्थित केले. तर जिल्ह्यातून सर्वात कमी, म्हणजे 50 प्रश्न कळमनुरी मतदारसंघाचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे विचारले आहेत.
या जिल्ह्यातुन 13 व्या विधानसभेच्या वेळेला आरोग्यासंबंधीत केवळ दोन प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, कोविड काळापासून झालेल्या सर्वच अधिवेशनात आरोग्यासंबंदीत प्रश्नांत वाढ झालेली पाहायला मिळते. लातुर जिल्ह्यातून सुद्धा या विधानसभेत 27 प्रश्न उपस्थित केले आहेत. यामध्ये लातुरमध्ये सुपर स्पेशालिटी रूग्णालय उभारणे, उदगिर तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, औसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या नवीन बांधकामास निधी उपलब्ध करुन देण्याबाबत, अहमदपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्याबाबत, किनगाव येथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयात करण्याबाबत, औसा तालुक्यातील किल्लारी येथे राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत आयुष रुग्णालय मंजूर करणे असे आरोग्या संबंधीत पायाभूत सोयीसुविधा संदर्भातले प्रश्न उपस्थित केले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न :
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | अभिमन्यु पवार | भाजप | औसा | 148 |
2 | अमित देशमुख | काँग्रेस | लातूर शहर | 124 |
3 | बाबासाहेब पाटील | राष्ट्रवादी काँ., जुलै 2023 पासून अजित पवार गट | अहमदपूर | 82 |
4 | धीरज देशमुख | काँग्रेस | लातूर ग्रामीण | 145 |
5 | संभाजीराव पाटील-निलंगेकर | भाजप | निलंगा | 26 |
6 | संजय बनसोडे (जुलै 2023 पासून मंत्री) | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | उदगीर (अ.जा.) | 45 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत लातुर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- अहमदपूर व चाकूर येथे वनपरिक्षेत्र अधिकारी व वनपाल अधिकाऱ्यांनी शायकिय निधीचा केलेला गैरव्यवहार
- मोहगाव येथे भेसळयुक्त तांदूळ वितरणाबाबत
- औसा व निलंगा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड प्रस्ताव प्रलंबित
- 1993 साली लातुर उस्मानाबादला झालेल्या तीव्र भूकंपामुळे तयार झालेल्या समस्या अजूनही पूर्णत: सोजवल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या भूकंपग्रस्तांच्या समस्याही लातुर जिल्ह्यातून उपस्थित केल्या आहेत.