14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
सातारा जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 356
सातारा जिल्ह्याशी संबंधित प्रश्न : 26
सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक चव्हाण यांनी विचारले होते. यापूर्वीच्या विधानसभेतही आमदारा दीपक चव्हाण यांनीच सर्वाधिक प्रश्न (93) विचारलेले. यावेळेस त्यांनी 164 प्रश्न विचारले. या प्रश्नांमध्ये आरोग्य, शालेय शिक्षण, बालक, महिला विषयक प्रश्न अधिक आहेत.
विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातून एकही महिला आमदार नाही.
सातारा जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | दीपक चव्हाण | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | फलटण | 164 |
2 | जयकुमार गोरे | भाजप | माण | 79 |
3 | महेश शिंदे | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | कोरेगाव | 9 |
4 | मकरंद जाधव | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | वाई | 22 |
5 | पृथ्वीराज चव्हाण | काँग्रेस | कराड दक्षिण | 136 |
6 | शामराव पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | कराड उत्तर | 28 |
7 | शिवेंद्रसिंहराजे भोसले | भाजप | सातारा | 4 |
8 | शंभूराज देसाई (2019 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू लागू नाही) | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | पाटण | 0 |
टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.
14 व्या विधानसभेत सातारा जिल्ह्याशी संबंधित उपस्थित प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- सायगांव येथील ग्रामस्थांना 1978 पासून गावठाण कब्जेपट्टी दिलेली नाहीये. यासाठी नवीन सातबाराऐवजी गावठाणाचा सिटी सर्व्हे तातडीने देण्याबाबत.
- कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील कायम दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याबाबत
- कोरेगाव तालुक्यातील सोनके येथल्या महाराष्ट्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळाने केलेला गैरव्यवहार
- कराड परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी कृष्णा व कोयना नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याबाबत
- सातारा जिल्ह्यात ऑगस्ट आणि ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निकषाबाहेर जाऊन मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलं असुनही अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याबाबत.
- कर्जमाफी योजनेतील अनेक पात्र शेतकरी देखील प्रोत्साहनपर योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याबाबत
- कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील श्री शिवाजी शिक्षण संस्था व शिवाजी विद्यालय, डिस्कळ, ता. खटाव, ही शाळा गावातीलच काही गुंडाकडून बळजबरीने बळकावण्यात आली असून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रचंड अनागोंदी व गैरकारभार सुरू असल्याबाबत
- जावळी तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित असल्याबाबत
- राज्यात विधानसभा निवडणुकीकरता असलेली मतदार यादी ही ग्रामपंचायतीला वापरणे गरजेचे असताना कोरेगाव मतदारसंघातील खेड ग्रामपंचायतीमध्ये मंडळ अधिकारी, तहसीलदार, प्रांत यांच्या चुकीच्या व भ्रष्ट भूमिकेमुळे चुकीच्या मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याबाबत
- सातारा जिल्हयातील रमाई आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान देण्याबाबत
- मायणी, ता. खटाव येथील रूरल इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च सेंटर व हॉस्पिटल, मायणी या मेडिकल कॉलेजच्या प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर बोगस कागदपत्रे तयार केली गेल्याबाबत
- जिल्हास्तरीय लहान वृत्तपत्रे, संपादकांचे अनेक प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.