14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
वर्धा जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 200
जिल्ह्याशी संबंधित प्रश्न : 40
वर्धा जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न हे हिंगणघाट मतदारसंघांचे आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित केले. त्यांनी एकूण 161 प्रश्न सभागृहासमोर मांडले. तर सर्वात कमी प्रश्न देवळी मतदारसंघांचे काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी विचारले आहेत.
‘संपर्क’ या संस्थेच्या अभ्यासात असं समोर आलं आहे की, यापूर्वीच्या 13 विधानसभेत वर्धा जिल्ह्यातील एकाही आमदारांनी महिलांच्या संबंधीत एकही प्रश्न विचारला नव्हता. या विधानसभेत महिला विषयक तीन प्रश्न विचारण्यात आले. जिल्ह्यातील विधानसभा सदस्यांनी सगळ्यात जास्त प्रश्न हे आरोग्य विषयक मांडले आहेत. त्यानंतर पाणी, शेती, सिंचन याविषयीचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | समीर कुणावार | भाजप | हिंगणघाट | 161 |
2 | दादाराव केचे | भाजप | आर्वी | 26 |
3 | डॉ. पंकज भुयार | भाजप | वर्धा | 12 |
4 | रणजित कांबळे | काँग्रेस | देवळी | 7 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत वर्धा जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- जिल्ह्यातील अवैध दारुविक्री
- जिल्ह्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित असल्याबाबत
- जिल्ह्यात समृध्दी महामार्गाच्या कंत्राटदारांकडून केले गेलेले अवैध उत्खनन
- जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयाच्या शिष्यवृत्ती खात्यातून भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम परस्पर काढण्यात आल्याबाबत
- वर्धा -यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाचे काम प्रलंबित असल्याबाबत
- अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची शेतकर्यांना भरपाई
- उन्हाळ्यातील पाणीटंचाई असे मह्त्वपूर्ण प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले.