14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5, 921
औरंगाबाद जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 131
औरंगाबाद जिल्ह्याशी संबंधित प्रश्नसंख्या : 15
औरंगाबाद जिल्ह्यातुन कन्नड मतदारसंघाचं शिवसेनेचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी सर्वाधिक (57) प्रश्न उपस्थित केले. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार अतुल सावे यांनी केवळ (7) प्रश्न विचारले.
यापूर्वीच्या विधानसभेत औरंगाबाद जिल्ह्यात महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता. मात्र या विधानसभेत महिला विषयक चार प्रश्न विचारले. यामध्ये औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील ऊसतोड करणाऱ्या महिलांचे गर्भाशय काढून टाकल्याची घटना व औरंगाबाद येथे पोलीस सहाय्यक आयुक्त यांनी महिलेचा विनयभंग केल्याची घटना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
याशिवाय राज्यातील बालमृत्युचे वाढते प्रमाण, जिल्ह्यातील निजामकालीन शाळांची निधीअभावी झालेली दुरवस्था, औरंगाबाद येथील शारदा मंदिर कन्या शाळेत अनुसूचित जाती-जमातीच्या मुलींकडून शाळा प्रवेशाच्या वेळी प्रवेश शुल्क वसूल केल्याबाबतचे प्रश्न सभागृहासमोर मांडण्यात आले.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | अब्दुल सत्तार, (2019 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही) | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | सिल्लोड | 0 |
2 | अतुल सावे | भाजप | औरंगाबाद पूर्व | 7 |
3 | हरिभाऊ बागडे | भाजप | फुलंब्री | 12 |
4 | प्रशांत बंब | भाजप | गंगापूर | 18 |
5 | रमेश बोरनारे | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट, | वैजापूर | 14 |
6 | प्रदीप जैस्वाल | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | औरंगाबाद माध्यम | 23 |
7 | संजय शिरसाट | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | औरंगाबाद पश्चिम | 9 |
8 | उदयसिंग रजपूत | शिवसेना, जून 2022 पासून ठाकरे गट | कन्नड | 57 |
9 | संदीपान भुमरे, (2019 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही) | शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट | पैठण | 0 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत औरंगाबाद जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- औरंगाबाद ते नागपूर या राज्य महामार्गावरील सुलतानपूर ते अंजनी या मार्गावर रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अपघाताचे वाढते प्रमाण
- जायकवाडी धरणावरील भूकंपमापक यंत्र बंद असल्याबाबत
- जिल्ह्यातील अवैधरित्या वाळूउपसा व गौणखनिजाच्या उत्खननामुळे राज्य सरकारचे लाखो रूपयांचे नुकसान
- पैठण शहरातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेची विक्री होत असल्याबाबत,
- वैजापूर येथे सुरू असलेला शासकीय धान्याचा काळाबाजार
- औरंगाबाद येथील बीड बाय पास रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेला उड्डाणपूल,
- अजिंठा लेणी परिसरातील पाणीपुरवठा खंडित