भारत आणि जगभरातील चर्चमध्ये ख्रिसमसच्या काळात भव्य सजावट केली जाते, पण भारतातील काही ऐतिहासिक चर्चमध्ये शांततेचं वातावरण असतं. या चर्चची उभारणी ब्रिटिश काळात झाली होती आणि ब्रिटिश भारतातून निघून गेल्यानंतर या चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली.
कर्नाल, हरियाणा
1806 पासून, कर्नाल हे ब्रिटिश सैनिकांचे महत्त्वाचे ठिकाण होते. दिल्ली आणि लाहोर यांना जोडणाऱ्या रस्त्यावर हे स्थानक होते. छावणीमध्ये सेंट जेम्स चर्च बांधण्यात आलं. या टॉवरचे बांधकाम लोकांनी दिलेल्या पैशांनी झाले होते. 1841 पर्यंत कर्नालमधील हवामान फारसं आरामदायक नसल्याने त्यावेळी तिथले नागरिक शेजारील शहर अंबालाला गेले. मग हे चर्चही तिथे हलवण्यात आले. पण तो टॉवर मात्र आजही कर्नाल इथे उभा आहे.
चर्चचे प्रार्थनागृह हलवलं तरी तिथली दफनभूमी वापरात होती. 1857 च्या बंडात ब्रिटिश सैन्याचे प्रमुख जनरल अँसन यांचे निधन झाले. त्यांना इथेच दफन करण्यात आले. नंतर त्यांचे अवशेष इंग्लंडला नेले गेले. अंबालातील नवीन चर्च 1965 मध्ये पाकिस्तानी हवाईदलाच्या हल्ल्यात नष्ट झाले. पण कर्नालमधील जुना टॉवर मात्र आजही उभा आहे. 1950 नंतर चर्चमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. आजही हे चर्च उभं असलं तरी, तिथे आठवड्यातून एकदाच धर्मगुरू भेट देतात.
नौगोंग, छतरपूर, मध्य प्रदेश
ब्रिटिशांनी इथल्या छोट्या-छोट्या राज्यांना जमीन देण्याचे ठरवले आणि या राज्यांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी एक अधिकारीही नियुक्त केला होता.नौगोंगमध्ये एक मोठी छावणी होती. सुरुवातीला ही छावणी नयागाव नावाच्या ठिकाणी होती. पण नंतर नौगोंगला हलवली गेली.
1857 मध्ये नौगोंगमध्येही उठावाचा फार मोठा परिणाम झाला. यामुळे इथली अनेक जुनी कागदपत्रे नष्ट झाली. त्यांनतर 1859 मध्ये, नॉगॉन्ग हे बुंदेलखंड पॉलिटिकल एजन्सीचे पहिले मुख्यालय बनले आणि 1860 च्या काळात इथे कॅन्टोन्मेंट चर्च बांधले गेले. सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक शाळाही सुरू करण्यात आली, तिला किचनर कॉलेज म्हणत.
पण कालांतराने, नौगोंगचे महत्त्व कमी होऊ लागले. किचनर कॉलेज पुण्याला हलवण्यात आले आणि छावणीही बंद झाली. आजही नौगोंगमध्ये ही जुनी चर्च इमारत आहे. पण इथे फारसे लोक येत नाहीत.
नौगोंगचा इतिहास खूपच समृद्ध आहे. इथे अनेक ऐतिहासिक इमारती आणि ठिकाणे आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, या ठिकाणाला तेवढे महत्त्व दिले जात नाही. खजुराहो जवळ असूनही, पर्यटक नौगोंगला पाहण्यासाठी फारसे येत नाहीत.
शेट्टीहळ्ली, हासन, कर्नाटक
1860 पर्यंत युद्धे संपली होती आणि ब्रिटिशांना आरामशीरपणे बसून स्वतःसाठी इस्टेट्स बांधता येत होते. कदाचित हे लक्षात घेऊनच मिशनरींनी हेमावती नदीच्या काठावर रोजरी चर्च बांधले होते. हे चर्च परिसरातील ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतीवासींसाठी एक धार्मिक केंद्र होते. दर रविवारी, ते या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी जमत असत.
20 व्या शतकाच्या मध्यभागी, हेमावती नदीवर बांधलेल्या धरणामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. परिणामी, शेट्टीहळ्ली आणि आसपासची गावे पाण्याखाली गेली. पण या सर्व गोष्टींमधूनही, रोजरी चर्च उभं राहिलं. पावसाळ्यात, हे चर्च पाण्यात बुडून जातं आणि उन्हाळ्यात पुन्हा दिसू लागते. म्हणूनच याला ‘फ्लोटिंग चर्च’ असेही म्हणतात.
या चर्चचे श्रेय फ्रेंच मिशनरींना जाते. त्यांनी या चर्चचे बांधकाम केले. अनेक दशकांहून अधिक काळ पाण्याच्या नुकसानीचा सामना करूनही, त्याचे उंच स्तंभ आणि कमानीदार भिंती आजही उभ्या आहेत. पारंपारिक विटा आणि चुन्याबरोबरच, इमारतीच्या बांधकामात इजिप्तियन जिप्सम, गूळ आणि अंड्यांच्या कवचाचाही वापर करण्यात आला होता. खिडक्यांसाठी बेल्जियमचे काच वापरण्यात आल्या होत्या.
बांदीकुई, दौसा जिल्हा, राजस्थान
18 व्या शतकाच्या उत्तरार्धात रेल्वे भारतात आली आणि 1874 मध्ये राजस्थानमध्ये पहिली रेल्वे सुरू झाली. बांदीकुईला रेल्वे मार्गाने जोडल्यामुळे येथील लोकसंख्या वाढली.
रेल्वे आल्यामुळे बांडीकुईला एक मोठे रेल्वे स्टेशन मिळाले. इथे काम करण्यासाठी अनेक लोक आले. त्यांच्यासोबत ब्रिटिश लोकही आले. याच काळात, इथे एक मोठं चर्च बांधण्यात आलं. या चर्चला सेंट जॉन द बॅप्टिस्ट अँग्लिकन चर्च म्हणतात. हे चर्च राजस्थानमधील सर्वात जुन्या चर्चंपैकी एक आहे.
कर्नाल आणि शेट्टिळ्ली इथल्या चर्च सारखे, हे चर्च पूर्णपणे सुरक्षित आणि सुस्थितीत नाही. स्थानिकरित्या उपलब्ध असलेल्या सॅंडस्टोनपासून बांधलेलं आणि विस्तृत जागेत एकटीच उभी असलेली ही इमारत अत्यंत आकर्षक आहे. तिचा बेल टॉवर फारच भव्य आणि उंच आहे.
पण आता चर्चची भव्यता फक्त बाहेरूनच दिसते. आधी ब्रिटिश आणि अँग्लो-इंडियन लोक इथे जमत असत. पण स्वातंत्र्यानंतर ख्रिश्चन लोकसंख्येत मोठी घट झाली. 1950 मध्ये सुमारे 60 कुटुंबे होती. आता फक्त एक प्रोटेस्टंट कुटुंब शिल्लक आहे. या ठिकाणी संरक्षणात्मक भिंत नाही. खिडक्या फोडल्या गेल्या आहेत, खुर्च्या चोरल्या गेल्या आहेत आणि बाप्तिस्मा पूलही तुटला आहे. आता हे ठिकाण जीर्ण झाले आहे. खरंतर त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
भारतातील या सर्व ऐतिहासिक चर्चचे स्थापत्य जपणं आवश्यक आहे.