भोपाळ गॅस दुर्घटनेतला कचऱ्याची अखेर साफसफाई

Bhopal Gas Tragedy waste disposal : भोपाळ गॅस दुर्घटनेला तब्बल 40 वर्ष उलटली तरी आजही तिथली जनता या दुर्घटनेचे  परिणाम भोगत आहे. या 40 वर्षात एकाही आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या दुर्घटनेचं भग्न अवशेष 40 वर्ष त्याचठिकाणी ठेवले होते. अखेर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा रासायनिक कचरा त्या कंपनीतून बाहेर काढून नष्ट करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
[gspeech type=button]

भोपाळ गॅस दुर्घटनेला तब्बल 40 वर्ष उलटली तरी आजही तिथली जनता या दुर्घटनेचे  परिणाम भोगत आहे. या 40 वर्षात एकाही आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही. मात्र, या दुर्घटनेचं भग्न अवशेष 40 वर्ष त्याचठिकाणी ठेवले होते. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बुधवारी 1 जानेवारीच्या मध्यरात्री हा कचरा दुर्घटनास्थळावरून हटवण्यात आला आहे. 

नेमकं काय घडलं?

भोपाळ गॅस दुर्घटनेमुळे भोपाळ औद्योगिक वसाहतीतील युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन कंपनी ही सील करण्यात आली होती. अनेक वर्षानंतरही कंपनीमधली रसायने, खते, कच्चा माल असा सगळा कचरा हा त्या कारखान्यात तसाच पडून राहिला होता. रासायनिक खतांचा कारखाना असल्याने पुढेही काही दुर्घटना घडून जीवाला धोका उत्पन्न होईल अशी तक्रार आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी मध्यप्रदेश हायकोर्टाकडे केली होती. मात्र, कोर्टाने या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. 3 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने या घटनेत हस्तक्षेप केला आणि चार आठवड्याच्या आत  हा कचरा दुर्घटनास्थळावरुन हटवण्याचे आदेश दिले. 

कचरा हटवण्यासाठी विशेष ग्रीन कॉरिडोर

भोपाळ गॅस दुर्घटना ही जगातली सर्वात मोठी औद्योगिक दुर्घटना म्हणून गणली जाते. या दुर्घटनेमुळे 377 टन धोकादायक रासायनिक कचरा निर्माण झाला होता. मध्यप्रदेशमधल्या धार जिल्ह्यातल्या पिथंमपूर औद्योगिक वसाहतीमध्ये हा कचरा नष्ट करण्यासाठी नेण्यात आला आहे. यासाठी एकूण 12 कंटेनर्स वापरण्यात आले. बुधवारी रात्री 9 वाजता हा कचरा घेऊन जायला सुरुवात केली होती. जवळपास सात तासामध्ये हा कचरा पिथंमपूर औद्योगिक वसाहतीमध्ये पोहोचवायचा होता. त्यासाठी भोपाळ, सेहुरा, दिवास, इंदोर आणि पिथंमपूर असा खास ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. 

100 माणसं आणि चार दिवस 

युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन कंपनीमध्ये तब्बल 377 टन रासायनिक कचरा पडून होता. रासायनिक कचरा असल्याने आणि विषारी वायू असल्याने ही संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक हाताळण्यात आली. याविषयीची माहिती भोपाळ गॅस दुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी दिली. 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 29 डिसेंबरपासून हा कचरा साफ करण्यास सुरुवात झाली. एकूण 100 जण या कामासाठी नेमण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांकरता फक्त 30 मिनिटांची एक शिफ्ट अशाप्रकारे शिप्ट लावण्यात आल्या होत्या. कंपनीच्या आवारात जाताना पीपीई कीट सह सुरक्षेसंदर्भातल्या उपाययोजनांची विशेष  काळजी घेतली जायची. 

दर 30 मिनीटानंतर कंपनीच्या आत गेलेली एक टीम बाहेर येत असे आणि दुसरी टीम आत जात असे. बाहेर आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होऊन त्यांना विश्रांतीसाठी वेळ दिला जायचा. 

हा सगळा कचरा एकूण 12 लीक प्रुफ आणि फायर रेझिझटन्स कंटेनर्समध्ये भरण्यात आला. प्रत्येक कंटेनरमध्ये 30 टन कचरा भरण्यात आला. सुरक्षित प्रवासासाठी ताशी सरासरी 50 किमी वेगाने हे कंटेनर चालवले जात होते.  

हा कचरा भोपाळमधून पिथंमपुर येथे घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ग्रीन कॉरिडोरपासून 200 मीटर पर्यंतचा परिसर सील केला होता. जवळपास 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. त्याचबरोबर, ॲम्बुलन्स, डॉक्टर्स, अग्निशमक दलाच्या गाड्या आणि 25 गाड्यांचा ताफा या कंटेनर्ससोबत होता. 

 हे ही वाचा : भोपाळचे ‘आफ्टर इफेक्टस्ट्’

रासायनिक कचऱ्यात कोणते घटक आहेत?

या रासायनिक कचऱ्यामध्ये पाच पद्धतीचे रासायनिक घटक आहेत. सेविन कीटकनाशक, संबंधित कारखान्याकडून उत्पादित केलेलं खत, दूषित माती, कीटकनाशकांचे अवशेष आणि उत्पादन केलेल्या प्रक्रियेतून शिल्लक राहिलेली उर्वरित रसायने इत्यादी घटकांचा समावेश होता. 

162 मेट्रिक टन दूषित माती, 92 मेट्रिक टन सेविन आणि नॅफथोल घटकाचे अवशेष, 54 मेट्रिक टन्स उत्पादन प्रक्रिया सुरू असलेले कीटकनाशके आणि 29 मेट्रिक टन्स खतं निर्मिती प्रक्रियेतील विविध अवशेष होते. या सगळ्या रासायनिक घटकांसोबत मिथाईल आयसोसायनेट हा विषारी वायूही होता. त्यामुळे या विषारी वायूची झळ न पोहोचता हा कचरा कारखान्यातून बाहेर काढणं खूप आव्हानात्मक होतं. 

कचरा नष्ट करण्याची प्रक्रिया कशी असणार?

पिथंमपूर औद्योगिक प्रकल्पामध्ये काही कचरा हा जाळला जाणार आहे. थोडा कचरा जाळल्यानंतर त्याच्या राखेचं परिक्षण केलं जाणार आहे. या राखेमध्ये सर्व घटक नष्ट होतात की नाही हे तपासलं जाणार आहे. जर या राखेमध्ये सर्व विषारी घटकांचं विघटन होऊन ते नष्ट झाले असतील तर, ती राख ही दोन स्तरामध्ये पाणी आणि मातीच्या संपर्कात येणार नाही अशा पद्धतीने जमिनीच्या आत पुरण्यात येणार आहे.

तसचं हा कचरा जाळल्यानतंर त्यापासून निघणाऱ्या धूरापासून हवा प्रदूषित होऊ नये, म्हणून इन्सिनेरेटर मधल्या फोर लेयर फिल्टर्समधून हा धूर बाहेर फेकला जाणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य प्रदूषण मंडळातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली जाणार आहे.

जाळलेल्या कचऱ्यामध्ये जर कोणत्याच प्रकारचे विषारी घटक शिल्लक राहिले नाहीत तर, येत्या तीन महिन्यात हा संपूर्ण 377 टन कचरा नष्ट केला जाईल. अन्यथा या प्रक्रियेसाठी 9 महिन्याचा कालावधी लागू शकतो असं भोपाळ गॅस दुर्घटना मदत आणि पुनर्वसन विभागाचे संचालक स्वतंत्र कुमार सिंग यांनी सांगितलं आहे. 

पिथंमपूरवासियांचा विरोध

कचरा विघटन करणारा पिथंमपूर हा मध्यप्रदेशातील अत्याधुनिक प्रकल्प आहे. सन 2015 साली ट्रायल म्हणून युनियन कार्बाइड कंपनीमधला 10 टन कचरा या प्रकल्पामध्ये जाळला होता. त्यापासून निर्माण झालेल्या राखेचा निचरा योग्य पद्धतीने न केल्यामुळे आजूबाजूलच्या परिसराती माती आणि पाणी दुषीत झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. 

मात्र, स्वतंत्र कुमार सिंग यांनी हा आरोप फेटाळला आहे. सन  2015 साली केलेल्या चाचणीनंतर तेथील माती आणि पाण्याचं परिक्षण केल्यानंतरच यावेळेस हा कचरा त्या प्रकल्पामध्ये नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. 

दरम्यान, पिथंमपूरमध्ये हा कचरा नष्ट केला जाऊ नये, म्हणून तेथील नागरिकांनी रविवारी आंदोलन करत निषेध नोंदवला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ