रंगपंचमीची रहाडी संस्कृती

Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग आणि पाणी ओतुन जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पुजा केली जाते. त्यानंतर लोक या रहाडमध्ये रंग खेळून रंगपंचमी साजरी करतात.
[gspeech type=button]

नाशिकमध्ये रंगपंचमीची आगळीवेगळी परंपरा आहे.  पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौद) खोदल्या जायच्या. या रहाडींमध्ये रंग आणि पाणी ओतून जलदेवतेची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते. त्यानंतर लोक या रहाडीमध्ये रंग खेळतात. वर्षोनुवर्ष चालत आलेली ही रहाडी म्हणजेच रहाड संस्कृती आजही नाशिकमध्ये तितक्याच श्रध्देने जपली जात आहे. 

रहाडी शब्दाची पार्श्वभूमी

पूर्वीच्या काळी पहिलवानांच्या शक्ती प्रदर्शनाकरता रहाड असत. या रहाडीमध्ये कुस्तीचे सामने रंगायचे. या कुस्तींमुळे या रहाड्यांमध्ये हाणामाऱ्या व्हायच्या. त्यावरुनच रहाडी हा शद्बप्रयोग प्रचलित झाला असावा.  

प्रत्येक रहाडीसाठी वेगळा रंग 

संपूर्ण नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पारंपरीक रहाड आहेत. या प्रत्येक रहाडांमधील पाण्याचा रंग ठरलेला आहे.

दंडे हनुमान चौकातील रहाड – रंग पिवळा

            दंडे हनुमान चौकातील रहाड

नाशिकमधल्या काझीपुरा पोलीस चौक परिसरात तीनशे वर्षांपूर्वीचा दंडे हनुमान रहाड आहे. पूर्वी इथे बैलगाडीवर मोठमोठे पिंप, पाण्याच्या टाक्या ठेवल्या जात असत. त्यातून पाणी घेऊन रंगपंचमी साजरी केली जात असे. मात्र कालांतराने ही परंपरा बंद पडली. सध्या रहाड खोदून त्यात पाणी भरून रंगपंचमी साजरी केली जाते. या रहाडीमध्ये पिवळ्या रंगाचेच पाणी असते. पिवळ्या रंगांची फुलं एकत्र करुन ही फुलं सुकवून त्यापासून नैसर्गिक रंग तयार करण्यात येतो. आणि मग हा रंग रहाडीतल्या पाण्यात मिसळतात. 

हे ही वाचा : सातपुडा खोऱ्यातील काठीची ‘राजवाडी होळी’ 

शनी चौकातील रहाड – रंग गुलाबी

                शनी चौकातील रहाड

पंचवटी परिसरातील शनी चौकातील रहाड पेशवे काळापासून प्रसिद्ध आहे. या परिसरात पेशव्यांचे सरदार वास्तव्यास होते. रास्ते सरदार या रहाडीची देखभाल करत असत. सध्या शनी चौकातील शनी चौक मित्र मंडळ आणि सरदार रास्ते आखाडा परंपरेने या रहाडीची काळजी घेतात. या रहाडीचा रंग गुलाबी आहे. रंगपंचमीच्या दिवशी दीक्षित घराण्याचे मानकरी रहाडीची पूजा करतात. रंगपंचमी झाल्यानंतर सागाच्या लाकडाच्या मोठ्या ओंडक्याने ही रहाड झाकून ठेवली जाते. 

तांबट लेनमधील रहाड – रंग केशरी

नाशिकमधल्या तांबट लेनमधील रहाड ही दगडी बांधकामात तयार केलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही रहाड दुर्लक्षित होती. तांबट लेनमधल्या युवकांनी एकत्र येत ही रहाड खुली केली आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो. रंगपंचमीच्या दिवशी इथल्या पाच कुटुंबीयांना पुजेचा मान दिला जातो. नैसर्गिक केशरी रंग तयार करण्यासाठी पळसाची फुले, तुळस आणि चंदनाचा वापर केला जातो. 

तिवंधातील रहाड – रंग पिवळा

तिवंधा चौकात बुधा हलवाईच्या दुकानासमोर ही पेशवेकालीन रहाड आहे. या रहाडीचा रंग पिवळा आहे. हा रंग फुलांपासून बनवला जातो. रहाडीचा मान जळगावकर कुटुंबीयांना आहे. या रहाडीत महिलांना प्रवेश दिला जातो. अर्धा भाग महिलांसाठी राखीव असतो तर अर्धा भाग पुरुषांसाठी राखीव असतो.

हे ही वाचा : धुलीवंदनादिनी नाशिकची वीर दाजीबा बाशिंग परंपरा

दिल्ली दरवाजा चौकातील रहाड – रंग केशरी

गोदाकाठावरच्या गाडगे महाराज पुलाजवळील दिल्ली दरवाजा चौकात पेशवेकालीन रहाड आहे. पळसाच्या फुलांपासून बनवला जाणारा रंग हे या रहाडीचे वैशिष्ट्य आहे. या रहाडीचा रंग केशरी असतो. रहाडीची देखभाल आणि मान तुरेवाले पंच मंडळ यांच्याकडे आहे. या रहाडीची परंपरा सुरू ठेवण्यासाठी आझाद सिद्धेश्वर दिल्ली दरवाजा मंडळाची स्थापना करण्यात आली होती.

रहाड, रंग आणि धप्पा

या रहाडीतील रंग इतका पक्का असतो की एकदा यात उडी मारली की किमान दोन दिवस तरी रंग निघत नाही. या रहाडीमध्ये उडी मारण्याच्या पद्धतीला ‘धप्पा मारला’ असे मजेदार नाव आहे. उडी मारण्यात तरबेज असलेल्यांनी या रहाडीत उडी मारताच किमान 20 ते 25 माणसांच्या अंगावर रंगाचं पाणी उडते.  

राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती असेल तर त्या त्यावर्षी  रहाडी बंद ठेवल्या जातात. लोकही वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यास सहकार्य करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भैरवनाथ यात्रा:सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या
बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. 'बगाड' यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून
Rajvadi Holi : नंदुरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या काठी येथे साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होळीचं केवळ देशातच नाही तर जगभरात मोठं आकर्षण आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ