जळगावसह महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांमधील भूजल प्रदूषित ; आरोग्याला धोका

Groundwater : केंद्रीय भूजल मंडळाच्या (CGWB) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या भूजलात विषारी घटक मिसळले असल्याचं उघड झालं आहे. हे घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
[gspeech type=button]

केंद्रीय भूजल मंडळाच्या (CGWB) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगावसह महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या भूजलात विषारी घटक मिसळले असल्याचं उघड झालं आहे. हे घटक आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण हे 45 मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केले आहे, पण अहवालानुसार देशभरातील 440 जिल्ह्यांमध्ये पाण्यात नायट्रेटचे प्रमाण या मर्यादेपेक्षा अधिक आढळले आहे. केंद्रीय भूजल मंडळाचा (CGWB) वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 मध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. या, अहवालानुसार अभ्यासलेल्या नमुन्यांपैकी 20 टक्के नमुन्यांमध्ये नायट्रेटची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे.

नायट्रेटचे प्रमाण अधिक असण्याचे मुख्य कारण म्हणजे अत्यधिक सिंचन आणि खतांचा वापर. खतांमधील नायट्रेट जमिनीत समृद्ध होऊन भूजलामध्ये मिसळतात आणि त्यामुळे पाण्यातील नायट्रेटची पातळी वाढते.

केंद्रीय भूजल मंडळाच्या अहवालानुसार, देशातील 15 जिल्ह्यांमध्ये भूजलात विषारी घटक अधिक प्रमाणात आढळले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव या सात जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये भूजलात नायट्रेटच्या प्रमाणामुळे आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर पर्यावरणीय संतुलनासाठी देखील हानिकारक आहे.

जळगावमधील बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांचे म्हणणे आहे की, नायट्रेटमुळे लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम आणि न्यूरल ट्यूब दोष होऊ शकतात. या विकारांवर उपचार गुंतागुंतीचे असतात यामुळे रुग्णांना निगराणीमध्ये देखील ठेवावं लागते.

नायट्रेटचे परिणाम

नायट्रेट पाणी किंवा अन्नाद्वारे शरीरात प्रवेश करते. ते तोंड आणि आतड्यांमध्ये असलेल्या जीवाणूंमार्फत ऑक्सि डायझर असलेल्या नायट्राइटमध्ये रूपांतरित होते. हे नायट्राइट रक्तातील हिमोग्लोबिनच्या कार्यावर प्रभाव टाकतो, अशा परिस्थितीत रक्त आपली ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता गमावते. यामुळे अनेक गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

कोणते आजार होऊ शकतात

नायट्रेटची वाढती पातळी असलेल्या पाण्यामुळे पोटाचा कर्करोग, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम, जन्मदोष , जन्मजात व्यंग, न्यूरल ट्यूब दोष हे विकार होऊ शकतात.

आजार न होण्यासाठी बचाव उपाय कोणते?

• पिण्याचे सुरक्षित पाणी वापरणे, जसे की बाटलीबंद पाणी.
• खासगी बोअरवेल किंवा विहिरीच्या पाण्याची वर्षातून एकदा तपासणी करणे.
• नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्यास, पाणी उकळून प्यावे.
• पाणी दूषित करणाऱ्या स्रोतांची शोध घेऊन त्यांना दूर करणे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भैरवनाथ यात्रा:सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या
बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. 'बगाड' यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून
Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ