बावधनच्या बगाड यात्रेचा उत्साह

बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. 'बगाड' यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकं सहभागी होतात. ही बगाड यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात. डोळ्याचे पारणे फेडणारी बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाते.
[gspeech type=button]

राज्यात रंगपंचमी विविध रंगांनी जल्लोषात साजरी केली जाते. पण याच दिवसापासून सुरुवात होते, सातारा जिल्ह्यातील बावधनच्या प्रसिद्ध यात्रेला. सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. बगाडयात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून लाखो लोकं सहभागी होतात. काशिनाथाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषात बगाड बावधनच्या दिशेने निघतात. नवस फेडण्यासाठी रंगपंचमीच्यादिवशी बगाड्याला बगाडाला टांगलं जातं. ही बगाड यात्रा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक बावधन गावात येत असतात. डोळ्याचे पारणे फेडणारी बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी बगाड यात्रा म्हणून ओळखली जाते.

काय आहे बावधनच्या बगाड यात्रेची परंपरा?

बावधनच्या बगाड यात्रेची परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे. याचे पुरावे बावधनच्या भैरवनाथाच्या मंदिरात सभामंडपावर ठोकलेल्या नवसाच्या नाले वरून लक्षात येते. या बगाडाचे वैशिष्ट्य म्हणजे या बगाड्याच्या रथाला ओढण्यासाठी खिलार बैलांच्या जोड्या लागतात. सोबत अनेक भाविक या बगाडासोबत पायी चालत राहतात. होळी पौर्णिमेपासून या यात्रेला सुरुवात होते. होळी पौर्णिमेला बावधनचा बगाड्या कोण हे ठरवण्यात येते. ज्या माणसाचा आधी केलेला नवस पूर्ण झाला आहे, अशाच माणसावर तो कौल येतो. बगाडाच्या पाच दिवस अगोदर होळीचा कार्यक्रम होतो. होळीच्या अगोदर भैरवनाथाच्या हळदीचा आणि लग्न सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतो. हळदीच्या कार्यक्रमादिवशी देवाला हळद लावली जाते.

बगाडी कसा निवडतात?

होळी पौर्णिमेला बगाडी निवडण्याचा कार्यक्रम पार पडतो. श्री भैरवनाथ मंदिरामध्ये कौल लावण्यात येतो आणि कौल कोणावर आलाय याचा निर्णय परंपरागत पुजारी आणि पंच मंडळी घेतात. कौल लावण्याच्या वेळी 100 ते 150 हून अधिक नवस केलेले लोक या ठिकाणी हजर असतात. पण या सर्वातून एकच बगाडी निवडला जातो.

बगाडाला जुंपण्यात येणाऱ्या बैल जोड्या

दर वर्षी एक नाल ठोकला जातो. धुरवीला दोन बैल, चावरी, सहा बैली, आठ बैली, बारा बैली अशा प्रकारे बारा बैल, सहा बैलजोड्या या बगाडाला जुंपलेल्या असतात.

हे ही वाचा : शहापूरची वेताळेश्वर जत्रा

कसे बनवले जाते बगाड?

जे बगाड बनवले जाते त्याचं वजन साधारण  3 ते 4 टनाच्या आसपास असते. बगाडाला दगडी चाके, दगडी चाकावर कणा, कण्यावरती बूट, बुटावरती साठी, साठीवर वाघ, वाघावर खांब, खांबावर शीड, शिडाला टांगलेला नवसाचा बगाड्या राहतो. बावधनच्या यात्रेचे विशेष म्हणजे या गावातील बलुतेदार सुतार समाज एकत्र येतात आणि ते बगाड बनवतात. त्यांच्या मदतीला गावातील इतर प्रमुख मंडळीही असतात.

बगाड असते तरी कसे?

बगाडाला दगडी चाके त्यावर कणा असतो. हा कणा साडेनऊ फुटाचा असतो. बगाडाला लागणारा कणा हा देशी बाबळी पासून बनवला जातो. दांड्या बुटामध्ये बसविण्यात येतात आणि त्यानंतर साठा बसवला जातो. त्यावर वाघ बसवला जातो. वाघाचे वजन साधारण दीड टनाच्या आसपास असते. कण्यामध्ये दोन्ही बाजूला दगडी चाके बसवण्यात येतात. 45 ते 50  फुटाचे गुंफलेले शीड बगाडाच्या खांबावर बसवलेले असते. बगाडाचा गाडा तयार करायला दहा ते बारा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे या यात्रेच्या दहा-बारा दिवस आधीच बगाड बनवण्याचे काम सुरू होते.

यावर्षी बगाड्या होण्याचा मान बावधन येथील अजित ननावरे यांना मिळाला. अजित ननावरे यांनी आपल्या भावाचे लग्न व्हावे असा नवस बोललेला होता. तो नवस पूर्ण झाला. त्यानंतर होळी पौर्णिमेच्या दिवशी नवस पूर्ण झालेल्या लोकांमधून अजित ननावरे यांच्या बाजूने कौल लागला आणि त्यांना यंदाचा बगाड्या होण्याचा मान मिळाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भैरवनाथ यात्रा:सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या
Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग
Rajvadi Holi : नंदुरबारमधल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या काठी येथे साजऱ्या होणाऱ्या राजवाडी होळीचं केवळ देशातच नाही तर जगभरात मोठं आकर्षण आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ