दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं केलं अनावरण
काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या कोल्हापुर दौऱ्यातील काही क्षणचित्रे.
या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानंतर राहुल गांधी यांनी सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहिले.
“हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो.” – राहुल गांधी
“छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही.” – राहुल गांधी
“महाराजांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे.” – राहुल गांधी
“भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे.” – राहुल गांधी
काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले होते. राहुल गांधी यांच्या कोल्हापुर दौऱ्यातील काही क्षणचित्रे.
या दौऱ्यात राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापुरातील कसबा बावडा येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.
लोकार्पण सोहळ्यानंतर राहुल गांधी यांनी सयाजी हॉटेल येथे आयोजित केलेल्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहिले.
“हा केवळ एक पुतळा नाही. तर एक विचार आहे. पुतळा तेव्हाच बनवला जातो, जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या विचारांचा आदर करतो.” – राहुल गांधी
“छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर ज्या विचारांसाठी लढले, तोच विचार आपण पुढे घेऊन जाणार नसू तर आज या पुतळ्याच्या अनावरणाचा काहीही अर्थ राहणार नाही.” – राहुल गांधी
“महाराजांच्या विचारांचा आणि संविधानाचा थेट संबंध आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे.” – राहुल गांधी
“भारतात सध्या दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. एक विचारधारा जी संविधानाचं तसेच समानतेचं रक्षण करते आहे. तर दुसरी विचारधारा संविधान संपवण्याचा प्रयत्न करते आहे.” – राहुल गांधी