जम्मू काश्मिरमध्ये दुसऱ्या टप्यासाठी मतदान सुरू

Source : ANI
Jammu - Kashmir Assembly elections : देशातील सर्वांचं लक्ष लागलेल्या जम्मू काश्मिरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरूवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 24.10 टक्के मतदान झालं. या टप्प्यात जम्मू-काश्मिरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.
[gspeech type=button]

देशातील सर्वांचं लक्ष लागलेल्या जम्मू काश्मिरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरूवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 24.10 टक्के मतदान झालं.

या टप्प्यात जम्मू-काश्मिरमधील सहा जिल्ह्यांतील 26 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यामध्ये काश्मिरमधील गांदरबल, श्रीनगर, बंडगाम आणि जम्मूमधल्या पूंछ, राजौरी, रियासी या जिल्ह्यातील मतदारसंघात मतदान होत आहे.

या टप्प्यातील सर्वच मतदारसंघ हे राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहेत. काश्मिरमधला गांदरबल मतदारसंघ हा नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचा बालेकिल्ला आहे. 1977 सालापासून अब्दुल्ला कुटुंबियांच्या ताब्यात हा मतदारसंघ आहे. यंदा ओमर अब्दुल्ला या मतदारसंघातून लढत असून सत्ता आल्यास कलम 370 पुन्हा लागू करण्याचं आश्वासन त्यांनी प्रचारा दरम्यान दिलं आहे.

अब्दुल्ला यांच्यासह जम्मू काँग्रेसचे काँग्रेस अध्यक्ष तारीक हम्मीद कारा हे श्रीनगरमधून लढत आहेत. भाजपाचे जम्मू येथील अध्यक्ष रविंद्र रैना हे नौशेरा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंपोरा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे सुद्धा सर्वाचं लक्ष लागून आहे. या मतदारसंघातून जम्मू-काश्मिर अपनी पार्टिचे संस्थापक अध्यक्ष अलताफ बुखारी, नॅशनल कॉन्फरन्सचे मुश्ताक अहमद गुरू आणि पीडीपीचे इक्बाल ट्रम्बू यांच्या प्रमुख लढत आहे.

या सहा जिल्ह्यातून 26 जागांसाठी तब्बल 239 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. श्रीनगरमध्ये 8 जागांसाठी 93 उमेदवार लढत आहेत. बडगाम जिल्ह्यात 5 जागांसाठी 46 उमेदवार, राजौरीमध्ये सुद्धा 5 जागांसाठी 34 उमेदवार, पुंछमध्ये 3 जागांसाठी 25 उमेदवार आणि गांदरबल मतदारसंघात 2 जागांसाठी 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे ही वाचा :

जम्मू-काश्मिरमध्ये मतदानाच्या उत्सवाला सुरुवात

या दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण 13.12 लाख पुरूष मतदार, 12.65 लाख महिला आणि 53 तृतीयपंथी मतदान करणार आहेत.

दरम्यान, दिनांक 18 सप्टेंबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी एकूण 61 टक्के मतदान झालं.

इथल्या निवडणुकीचा शेवटचा व तिसरा टप्पा हा 1 ऑक्टोबरला होणार आहे. यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 8 ऑक्टोबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ