जम्मू-काश्मिरमध्ये मतदानाच्या उत्सवाला सुरुवात

Source : Election Commission Of India
जम्मू- काश्मिरमधल्या नागरिकांना तब्बल 10 वर्षानंतर मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं मतदान करण्यासाठी बाहेर पडली आहेत.
[gspeech type=button]

जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरूवात झाली आहे. काश्मिरमधल्या 16 तर जम्मूमधल्या 8 अशा एकूण 24 मतदारसंघासाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 26.72 टक्के मतदान झालं आहे.
काश्मिरमधील 47 आणि जम्मूमधील 43 विधानसभा मतदारसंघ, अशा एकूण 90 मतदारसंघासाठी निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या पुढील दोन टप्प्यांतील मतदान अनुक्रमे 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. याकरताची मतमोजणी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

दहा वर्षानंतर जम्मू-काश्मिरमध्ये निवडणुका

केंद्र सरकारने दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 निष्क्रिय केलं. त्यानंतर जम्मू-काश्मिर व लडाख या जिल्ह्यांचा समावेश केंद्रशासित प्रदेशामध्ये करण्यात आला. त्यामुळे या भागात 2014 नंतर निवडणुका झाल्या नव्हत्या.
आज, तब्बल 10 वर्षानंतर इथल्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं मतदान करण्यासाठी बाहेर पडली आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. तसेच सर्व मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळतो.

मोठ्या उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन

दरम्यान, निडवणूकीच्या या राजकीय उत्सवात सर्व नागरिकांनी सहभागी होत मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स प्लॅटफॉर्मवरून जम्मू-काश्मिरमधल्या सर्व मतदारांना केलं आहे.

तर, काँग्रेस नेते राहूल गांधी यांनीही जम्मू-काश्मिरमधील नागरिकांना संविधानिक मार्गाचा अवलंब करत मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ