कौटुंबिक सरमिसळ 

Family Relations : 'लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं नाही तर दोन कुटुंबाचं होतं’, असं म्हटलं जातं. पण हे नातं टिकवण्याची,या नात्याच्या यश- अपयशाची जबाबदारी ही फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तिंची असते. म्हणून लग्नानंतर पती-पत्नीची त्यांच्या आयुष्यात प्रथम स्थान हे त्यांच्या जीवनसाथीदाराचचं असलं पाहिजे.
[gspeech type=button]

लग्न हा कुटुंबव्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे हे नातं जरी पती-पत्नीचं असलं तरी त्यातला मुख्य घटक हा कुटुंब असतो. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या दाम्पत्यांचं एकमेकांच्या कुटुंबाप्रतीचं नातं हे आपल्या साथीदाराला सुखावणार असावं. कारण त्यामुळे या नवीन नात्याची वीण सुद्धा घट्ट होत जाते. जी कुटुंबसंस्था आणि पुढच्या आयुष्याकरता खूप महत्त्वाची असते. 

साथीदार ही पहिली प्राथमिकता

‘लग्न हे केवळ दोन व्यक्तिंचं नाही तर दोन कुटुंबाचं होतं’, असं म्हटलं जातं. मात्र, अलीकडे अभिनेत्री विद्या बालन यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलय की, “लग्न हे दोन व्यक्तिंचचं असतं. त्या लग्नाचं यश – अपयश ही केवळ त्या दोन व्यक्तिंचीच जबाबदारी असते.” 

आजची बदलती परिस्थिती पाहता यात तथ्यही आहे. कुटुंब ही आपली प्राथमिकता असावी. पण जेव्हा लग्न होतं, तेव्हा पती-पत्नी एकमेकांची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. कारण पती-पत्नी हे एक नवीन कुटुंब निर्माण करण्यासाठी एकत्र आलेले असतात. आणि एकमेकांना प्रत्येक क्षणी साथ देण्याचं आश्वासन दिलेलं असतं. त्यामुळे आत्तापर्यंत आपल्यासाठी आपले आई-वडिल, भाऊ-बहिण हे  आपले सर्वस्व असले तरी लग्नानंतर आपल्या आयुष्यात पहिलं स्थान हे आपल्या पत्नीचं वा आपल्या पतीचं असलं पाहिजे. 

एकमेकांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल चर्चा

कोर्टशिप म्हणजे लग्न ठरणं ते प्रत्यक्ष लग्न होण्याच्या  कालावधीत मुला-मुलीने एकमेकांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवर चर्चा केली पाहिजे. तुमच्या साथीदाराला तुम्ही कोणत्या वातावरणात वाढला आहात, तुमचं संगोपन कसं झालं आहे, याची कल्पना असायला हवी. कारण कौटुंबिक वातावरणानुसार आपलं व्यक्तिमत्व, स्वभाव घडत असतो. मुली या लग्नानंतर आपलं घर सोडून दुसऱ्या घरात प्रवेश करत असते. अशावेळी सासरकडच्या मंडळीने आणि सगळ्यात जास्त नवऱ्या मुलाने नववधुला आपल्या घरात सामावुन घेता यावं यासाठी मदत केली पाहिजे. 

उदा. समजा मुलीच्या घरात वाढदिवसाचे प्रसंग देखील खूप उत्साहाने साजरे करण्याची पद्धत असेल. मुलाच्या घरात मात्र आनंदाचे प्रसंग वा समारंभ एकदम गाजावाजा करण्याची पद्धत नसू शकते. अशावेळी मुलीला नवीन घरात मोकळेपणा वाटावा यासाठी असे वाढदिवस साजरे करायला सुरुवात करावी. थोडक्यात घरात सुन म्हणून आलेल्या मुलींच्या पूर्वीच्या कौटुंबिक वातावरणाला मिळते-जुळते बदल  छोटे-मोठे बदल करावेत. याने त्या मुलीलांही नवं घर आणि घरातील माणसंही आपलीशी वाटतील.

लहाणपणापासून आपण ज्या वातावरणात वाढतो त्याचा आपल्या विचारसरणीवर प्रभाव पडत असतो. त्यामुळे एखाद्या घटनेवर आपल्या साथीदारांची प्रतिक्रिया कशी असू शकते याची कल्पना  येते. एकूणच साथीदाराला समजून घेताना कौटुंबिक पार्श्वभूमी माहीत असेल तर खूप मदत होते. 

कौटुंबिक रितीभाती

आंतरजातीय, आंतरराज्य विवाह असेल तर त्याठिकाणी सांस्कृतिक, धार्मिक असे खूप फरक असतात. या बदलांची आपल्याला शक्य तेवढी माहिती असायला हवी. एकाच समाजातील, धर्मातले जरी असाल तरी सणवार, उत्सव साजरा करण्याच्या पद्धती, आहाराविषयीच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपल्या घरात काय, कसं असतं याविषयी आपण आपल्या साथीदाराला सांगितलं पाहिजे. या गोष्टी शेअर केल्याने आपल्या कुटुंबासोबत जुळवून घेताना आपल्या साथीदाराला थोडं सोपं जातं. 

आई-वडिलांची जबाबदारी

आपल्या अपत्याचं सुयोग्य मुलगा वा मुलीशी योग्य वेळेत लग्न व्हावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. पण लग्नघटीका जवळ आली की जेवढी घालमेल ही लग्न करणाऱ्या मुला-मुलीची होते, त्याहून जास्त घालमेल ही आई-वडिलांची होते. ‘आपली मुलगी ही लग्न करुन दुसऱ्या घरी जाणार तिकडे तिचं कसं  होणार’ याची चिंता मुलीच्या आई-वडिलांना असते. तर ‘आपला मुलगा हा आता आपला राहणार नाही तो आता सगळं त्याच्या बायकोचं ऐकणार’, अशी चिंता मुलाच्या आईला लागलेली असते. 

हा भावनांचा प्रश्न आहे. पण आपल्या मुलांचा संसार हा उत्तम प्रकारे चालावा म्हणून दोन्ही बाजूच्या आई-वडिलांनी आपल्या भावनांना आवर घालण्याची गरज आहे. ‘आम्ही सांगू तेच करा’ या भूमिकेऐवजी आवश्यकता असल्यास मार्गदर्शनाची भूमिका आत्मसात केली तर, नवदाम्पत्यांनाही त्यांचं नातं जगायला, घडणाऱ्या चुकांतून शिकायला मदत होईल. 

आई-वडिल की पत्नी

नवदाम्पत्यांच्या संसारातला हा महत्त्वाचा मुद्दा बनत आहे. अनेकदा लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच सासरी आलेल्या मुलीचं तिच्या सासरच्या मंडळीशी पटत नाही. तर कधी सासू-सासऱ्याकडूनही घरी आलेल्या सूनेसोबत जमत नाही. अशावेळी नवऱ्याच्या भूमिकेत असलेल्या मुलाकडे दोन्ही बाजुंनी तक्रारीचा पाढा वाचला जातो. तेव्हा  नवऱ्या मुलाला ‘बिचाऱ्याचं सॅन्डवीच होतं’ असं म्हटलं जातं. हे वाद छोट्या पातळीपर्यंत असतात तोवर ठीक.  पण यामुळे जर तुमचा संसार रुळावरून घसरत असेल तर नवीन घरात संसार सुरू करणं उत्तम. कारण अनेकदा आई-वडिलांसोबत अंतर ठेवून ही नातं जपता येते. पण लग्नाच्या बंधनांने जोडलं गेलेलं नातं टिकवणं हे जास्त महत्त्वाचं असतं.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Family Expansion after marriage : लग्न झालं म्हणजे त्या मुलीवर - त्या मुलावर माझा पूर्ण हक्क आहे, अशी भावना निर्माण
Financial Management : भावनिक आणि प्रॅक्टिकल असणं या लग्नाच्या नात्याच्या दोन बाजू आहेत. जसं केवळ पैशाने आनंद, सुख मिळत नाही
Emotions in Marriage : आपली सगळी नाती ही रक्ताने जोडलेली आहेत. लग्नाचचं नातं हे असं आहे जे प्रेम आणि विश्वासाच्या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ