लग्न झाल्यानंतर खरचं आपण बदलतो का?

Marriage: लग्न झालेल्या सगळ्याच नवदाम्पत्यांमध्ये लग्न झाल्या दिवसापासूनच बदल घडायला सुरुवात होते. आणि ते ही व्यक्तिमत्वावर आधारित बदल घडत असतात.
[gspeech type=button]

लग्न झालं की महिन्याभरातच, ‘किती बदललीस गं’ हा एक ठरलेला डायलॉग आपल्याला ऐकायला मिळतो. अर्थातच हा डायलॉग शेजारच्या काकू किंवा जवळच्या नातलगांपैकी कोणीतरी आपल्याला बोलत असतात. ही स्तुती अंगाने जाड झालो की सडपातळ झालो या अर्थाने असतो.

पण तुम्हाला माहीत आहे का? लग्न झालेल्या सगळ्याच नवदाम्पत्यांमध्ये लग्न झाल्या दिवसापासूनच बदल घडायला सुरुवात होते. आणि ते ही व्यक्तिमत्वावर आधारित बदल घडत असतात.

आपला स्वभाव कसाही असला तरी लग्नानंतर जवळपास दोन वर्षात आपल्या स्वभावात आपल्याही नकळत बदल घडतो. आणि यात गंमतीचा भाग असा की, जसं जसं लग्नाला वर्ष उलटतात तसे आपण आपल्या मूळ स्वभावाप्रमाणे वागायला लागतो… थोडक्यात लग्नाची नवलाई संपली की, आपण लग्नापूर्वी होतो तसेच वागायला लागतो.

संशोधकांचा दावा

जस्टीन लेव्हनर, ब्रेडन वेस, जोशुआ डी मिलर आणि बेंजामिन आर कर्णे यां चार संशोधकांनी आपल्या अभ्यासातून हा दावा केला आहे की, लग्न झाल्यावर दोन वर्षात माणसाच्या व्यक्तिमत्वात आमुलाग्र बदल घडतात. मात्र, हे बदल क्वचितच कायमस्वरूपी टिकतात. अनेकदा जसं जसं लग्नाला अधिकाधिक वर्षे होऊ लागतात, त्यानुसार व्यक्तिमत्वात झालेले हे बदल पूर्वपदावर येतात. यासाठी संशोधकांनी एकुण 169 नवदाम्पत्यांना या संशोधनात सहभागी करुन घेत त्यांच्यामध्ये घडणाऱ्या मानसिक, वैचारिक बदलांवर अभ्यास केला होता.

व्यक्तिमत्वात घडणारे मुख्य पाच बदल

संशोधकांच्या मते, लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्यांमध्ये मोकळीकता (openness), कर्तव्यदक्षता (conscientiousness), उघडपणे बोलणे, (extraversion), सहमती दर्शवणे (agreeableness), आणि न्यूरोटिझम (neuroticism) ही पाच स्वभाव वैशिष्ट्ये आढळून येतात.

नवदाम्पत्य आपलं हे लग्नाचं नवीन नातं स्वखुशीने आणि पूर्ण आनंदाने स्वीकारतात, तेव्हा ते हे नातं जबाबदारीने निभावण्यासाठी आपल्या स्वभावातही बदल करत असतात. आपल्या साथीदारांशी छोटया छोटया गोष्टी शेअर करणे, साथीदारांच्या आवडी-निवडीनुसार कपडे परिधान करणे, साथीदाराची काळजी घेणे, एकमेकांची मते विचारात घेऊन निर्णय घेणे या गोष्टी वर उल्लेख केलेल्या स्वभावातील गुण वैशिष्ट्याशी जोडलेल्या क्रिया आहेत.

यातील न्यूरोटिझम म्हणजे नकारात्मक भावना सहन करणे, लग्नाच्या या नात्यात सुरुवातीपासूनच आपल्या साथिदाराब‌द्दल भिती, राग, अस्वस्थता, स्वतः बाबत न्यूनगंड अशा सगळ्या नकारात्मक भावनाही या दोन वर्षात विकसीत होत असतात. कालांतराने एकतर या भावना बदलतात किंवा कायमस्वरूपी तशाच राहतात.

पती-पत्नीवर कसा परिणाम होतो

लग्न झाल्यानंतर बहुतांशी महिलांमध्ये एक भावनिक स्थिरता येते. त्या आपल्या मनाची तयारी करून नव्या भूमिकेचा स्वीकार करतात. लग्नानंतर त्या कमी चिंताग्रस्त आणि त्यांचा रागही कमी झाल्याचं अभ्यासात आढळून आलं आहे.

पुरुष हे जास्त कर्तव्यदक्ष आणि जबाबदार होतात. असा दावा संशोधकांनी केला आहे. म्हणूनच ‘एकदाच का याचं लग्न झालं की हा सुधारेल’ ही म्हण प्रचलित असावी.

हे बदल कायमस्वरूपी नसतात

लग्नाच्या पहिल्या दोन वर्षात घडणारे हे बदल सगळ्याच्याच बाबतीत कायमस्वरूपी राहत नाहीत. प्रत्येक व्यक्तिनुसार, त्यांच्यातील नात्यानुसार त्या पती-पत्नीमध्ये लग्नाच्या सुरुवातीला झालेल्या बदलांमध्ये आपल्याला विसंगती आढळू शकते.

संशोधक म्हणतात की, जसजशी लग्नाला वर्षे उलटू लागतात तसतसे लग्न नात्यातील पूर्वी आकर्षक वाटलेल्या गोष्टीचं रूपांतर हे दैनंदिन गोष्टीमध्ये व्हायला लागते. त्यामध्ये नाविन्य राहत नाही. पती-पत्नी एकमेकांना गृहीत धरु लागतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी एकमेकांबरोबर पूर्वीसारख्या शेअर करत नाहीत. स्वतःच्या बाबतीतला एखादा छोटासा निर्णयही पूर्वी साथिदारांच्या विचाराने घेतला जायचा तेथे स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतला जातो. हे छोटे-छोटे बदल पती-पत्नीच्या नकळत घडत जातात. हळूहळू पती-पत्नीमध्ये एकमेकांच्या सर्वच गोष्टीला सहमती देण्याऐवजी जे पटत नाही, आवडत नाही त्या गोष्टीला असहमती देण्यास सुरुवात होते.

संशोधकांच्या मते, जेव्हा पती-पत्नीमध्ये हे बदल दिसू लागतात तेव्हा त्यांनी आपल्या लग्नाच्या नात्याला पूर्ण स्वीकारलं असून ते त्या नात्यामध्ये स्थिरस्थावर झाल्याचं हे चिन्ह असते.

लग्नाच्या नात्यावर काय परिणाम होतो?

लग्नातील दोन वर्षात पती-पत्नी एकमेकांसोबत असलेली वागणूक आणि काही ठराविक वर्षानंतर बदलेली वागणूक यामुळे त्या नात्यावर विशेष फरक पडत नाही. लग्नाच्या या नात्यात ठराविक काळानंतर स्वभावात घडलेल्या बदलांचा कोणत्याच स्वरूपाचा परिणाम हा त्या दाम्पत्यांच्या कौटुबिंक

जीवनावर, पालकत्वावर होत नाही असा दावा संशोधकांनी केला आहे. ते असं म्हणतात की, मानवी जीवन हे सातत्याने बदलत असतं. माणूस हा परिस्थितीनुरूप वागतो. त्यामुळे माणसाच्या स्वभावात वारंवार घडणारे हे बदल सामान्य असून ते दुर्लक्ष करण्याजोगे नाहीत.

लग्न यशस्वी करण्यासाठी पती-पत्नीकडे स्वनियंत्रण आणि माफ करण्याचं महत्वाचं कौशल्य, गुण असावा असं स्पष्ट मत या संशोधकांनी आपल्या अभ्यासाअंती मांडल आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र
Pet Cloning Market in china : क्लोनिंगचे एवढे प्रचंड दर असूनही चीनमध्ये आपल्या पाळीव प्राण्याचं क्लोनिंग करण्याचं प्रमाण अधिक आहे.
Kancha Gachibowli : सरकारला गरज पडली की सरकारी जमिनींचा लिलाव करायचा हा अघोषित, अलिखित कायदाच बनला. तेलंगणा सरकारनेही सरकारी तिजोरी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ