आपली गुंतवणूक, आपल्या हाती

Image caption
गुंतवणूकीचे (Investment) निर्णय हे बहुतांश वेळी घरातला कर्ता पुरुष घ्यायचा आणि त्याबद्दल कोणालाही काहीही माहिती नसायची. जेव्हा घरची पुढची पिढी कमवायला लागायची तेव्हा हळूहळू ही गुंतवणूक पुढे सांगितली जायची. पण इंटरनेटमुळे गुंतवणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आणि मार्ग उपलब्ध झाले.
[gspeech type=button]

गुंतवणूक हा सध्या एक  चर्चेचा विषय झालेला आहे, नाही का ?

एक काळ असा होता, म्हणजे फार लांब जायची गरज नाही. अगदी 50-60 वर्षांपूर्वी गुंतवणूक ही खूप गोपनीय गोष्ट समजली जायची. गुंतवणूकीचे निर्णय हे बहुतांश वेळी घरातला कर्ता पुरुष घ्यायचा.  या गुंतवणुकीबद्दल कोणालाही काहीही माहिती नसायची. घरची पुढची पिढी कमवू लागल्यावर हळूहळू ही गुंतवणूक नंतर सांगितली जायची.  गुंतवणुकीच्या बाबतीत घरातल्या स्त्रियांना काहीच स्थान नसायचे.

पारंपरिक गुंतवणूक

अर्थात, गुंतवणुकीचे पर्यायदेखील त्याकाळी फार कमी उपलब्ध होते. ‘सोने’ आणि ‘घर’ हे गुंतवणुकीचे मुख्य पर्याय होते. याच्याहून थोडं पुढे गेलो तर पुढचा पर्याय म्हणजे कोणत्यातरी जमिनीत केलेली गुंतवणूक.  1980  च्या दशकात थोडी परिस्थिती बदलायला सुरुवात झाली. बँकेत FD सारखा पर्याय सर्रास वापरायला सुरुवात झाली. त्याचबरोबर NSC आणि KVP सारख्या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक वाढायला लागली. PF खूप महत्त्वपूर्ण झाला. आणि सगळ्यांचाच आवडता पर्याय म्हणजे LIC पॉलिसीज मध्यमवर्गीयांच्या घराघरात जाऊन पोचली.  

खरं पाहता ‘LIC पॉलिसी ही गुंतवणूक नसून, एक इन्शुरन्स पॉलिसी आहे’, हे वास्तव आज देखील कित्येक लोकांच्या पचनी पडत नाही.  तर त्याकाळात हे समजणं जरा अवघडच होतं. त्यावेळी गुंतवणुकीचे एवढेच मर्यादित पर्याय उपलब्ध होते. हे सगळे पर्याय आपल्या घरात आले म्हणजे, आयुष्य सार्थकी लागलं असं वाटायचं. 

शेअर मार्केटची हवा

पण अचानक वृत्तपत्रातून वेगळेच वारे वाहू लागले. 1980 च्या दशकाच्या शेवटी शेअर मार्केटची हवा सगळीकडे वाहायला लागली. आणि गुंतवणुकीचा एक नवीन पर्याय लोकांसमोर आला. घाबरत-घाबरत का होईना पण हळू-हळू मध्यमवर्गीय लोकांच्या घरात विविध कंपन्यांच्या शेअर सर्टिफिकेटचा शिरकाव व्हायला लागला. थोड्याच दिवसात या शेअर सर्टिफिकेटच्या पंक्तीत बाजूला जाऊन बसली ती म्हणजे युनिट ट्रस्टच्या वेगवेगळ्या स्कीमची सर्टिफिकेटस.  मग इथेच खरी सुरुवात झाली ती ‘गुंतवणुकीच्या चर्चेची’. 

याच खरं कारण होतं की, गुंतवणुकीसाठी ठोकताळे असलेले फक्त 5-6 पर्याय नव्हते. तर हजारो कंपन्या होत्या. ज्याबद्दल आपापसात चर्चा केल्याशिवाय माहिती मिळणे अशक्य होतं. आता ही मिळालेली माहिती योग्य की अयोग्य हा एक वेगळाच विषय होता. त्याचबरोबर आर्थिक बातम्या देणारी वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनल सगळीकडे झळकू लागली. पण या सगळ्यामुळे गुंतवणुकीच्या चर्चेला सुरुवात झाली खरी.

परदेशी गुंतवणूक आणि रिअल इस्टेट

1990 चे दशक हे गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर फारच वादळी होतं. विविध अस्थिर सरकारे, शेअर मार्केटमधला ‘हर्षद मेहता घोटाळा’ यामुळे शेअर मार्केट वर-खाली  होऊ लागले.  सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झालेला गुंतवणुकीचा पर्याय अचानक रिस्की वाटायला लागला. काही लोकांनी शेअर बाजारात गटांगळ्या खाल्ल्या तर काहींचे पैसे कोणत्या तरी जागेत अडकून पडले होते. पण त्याचबरोबर काहीजण असेही होते, ज्यांच्या जागांचे भाव दुप्पट झाले होते. तर काहीजणांनी शेअर बाजारात एवढी कमाई केली होती, की नोकरी सोडून त्यांनी त्याचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला होता.

पण याच दशकात भारतात परदेशी गुंतवणुकीचा शिरकाव झाला. लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली. त्यापाठोपाठ आले, रिअल इस्टेट मध्ये बूम.. जागांचे भाव अचानक वाढायला सुरुवात झाली आणि वाढलेल्या उत्पन्नाला गुंतवणुकीसाठी मोठा पर्याय मिळाला.

नवीन शतकाच्या सुरुवातीला खूप शांतपणे गुंतवणुकीच्या एका नवीन पर्यायाने एन्ट्री घेतली होती. ज्याला मध्यमवर्गीयांनी फार महत्त्व दिलं नव्हतं. पण लवकरच तो पर्याय नुसता घरातच पोचणार नव्हता, तर गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय होणार होता. 

गुंतवणुकीचा लोकप्रिय पर्याय म्युच्युअल फंड

‘म्युच्युअल फंड’ थोडक्यात सांगायचं तर लोकांकडून पैसे घेऊन ते शेअर मार्केट मध्ये गुंतवायचे. अर्थातच शेअर बाजारात झालेले घोटाळे थांबवण्यासाठी, शेअर बाजारातील गुंतवणूक नियमित आणि नियंत्रित करण्यासाठी सेबीची स्थापना झाली.  RBI, IRDA आणि AMFI सारख्या विविध सरकारी यंत्रणांच्या नियंत्रणामुळे म्युच्युअल  फंड मधली गुंतवणूक चांगलीच तावून सुलाखून निघाली. त्यामुळे  मध्यमवर्गीयांच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये याचा थोड्या प्रमाणात वापर होऊ लागला. पण म्युच्युअल फंड हे शेवटी शेअर बाजारावर अवलंबून असल्यामुळे त्याप्रमाणेच वरखाली होत होते.

2008 सालच्या अमेरिकेतील लेहमन ब्रदर प्रकरणानंतर जगभरातले शेअर बाजार कोसळले. त्याचा भारतीय शेअर बाजारावर पण मोठा परिणाम झाला. लोकांनी परत शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड कडे पाठ फिरवली.  रिअल इस्टेट मधल्या गुंतवणुकीला पुन्हा प्राधान्य दिलं. मात्र हळूहळू मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जाणारे जागांचे भाव बघता, लोकांचा कल परत शेअर मार्केटकडे झुकायला लागला. यावेळी मात्र डायरेक्ट शेअर्स खरेदी करण्याच्या ऐवजी लोकांनी म्युच्युअल फंड मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला सुरूवात केली.  लोकांच्या गुंतवणूक चर्चेत आता विविध कंपन्यांच्या शेअर ऐवजी विविध म्युच्युअल फंडचे विषय जास्त चर्चिले जातात.

पोर्टफोलिओ

2014 मध्ये  भारतातील सत्तांतर आणि त्यानंतर परदेशी गुंतवणुकीचा भारताविषयीच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल झाले.  लोकांनीही मोठ्या प्रमाणावर  शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट आणि म्युच्युअल फंडद्वारे गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. यामुळे शेअर बाजाराला स्थैर्य मिळाले. महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणारा, गुंतवणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आणि पारदर्शकता असणारा फंड असा  एक उत्तम पर्याय गुंतवणुकदारांना मिळाला.

2020 च्या सुरूवातीला आलेल्या कोविडच्या लाटेत गुंतवणुकीइतकेच ‘लाईफ आणि मेडिकल इन्शुरन्स’चे महत्त्व लोकांच्या लक्षात आले. त्यामुळे पोर्टफोलिओ नावाची कॉन्सेप्ट घराघरात पोचली. 

इंटरनेटच्या लाटेने जसे नवनवीन खर्च लोकांना करायला शिकवले. त्याचबरोबर गुंतवणुकीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती आणि पारदर्शकतादेखील नक्कीच आणली. त्यामुळे पूर्वीचा गुंतवणूक हा गोपनीय विषय आता नक्कीच एक दैनंदिन चर्चेचा विषय झालेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ