पुराणाकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून पाहणारे संशोधक डॉ. ओक

रामायण, महाभारत ही आपल्यासाठी केवळ पुस्तकं नाहीत. अनेकांसाठी ती श्रध्दास्थानं आहेत. रामायण किती वर्षांपूर्वी घडलं, रामाला वनवास 12 वर्षांचाच का झाला, महाभारताचं युध्द नेमकं कधी सुरु झालं, ते कधी संपलं, श्रीकृष्णाची द्वारका कशी बुडाली, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याची उत्तरं अनेक ठिकाणी सापडतीलही. पण इतिहास किंवा पुराणातील प्रश्नांसाठी दाखले आवश्यक असतात. राम-कृष्णाच्या कथांबाबत तर्कशुध्द मांडणी करणं हे निलेश ओक यांचं वैशिष्ट्य आहे.
[gspeech type=button]

पुराणातील उत्तरांसाठी संशोधन

रामायण, महाभारत ही आपल्यासाठी केवळ पुस्तकं नाहीत. अनेकांसाठी ती श्रध्दास्थानं आहेत. रामायण किती वर्षांपूर्वी घडलं, रामाला वनवास 12 वर्षांचाच का झाला, महाभारताचं युध्द नेमकं कधी सुरु झालं, ते कधी संपलं, श्रीकृष्णाची द्वारका कशी बुडाली, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. याची उत्तरं अनेक ठिकाणी सापडतीलही. पण इतिहास किंवा पुराणातील प्रश्नांसाठी दाखले आवश्यक असतात. त्यासाठी केवळ ऐकीव माहिती उपयोगाची नाही, तर शास्त्रशुध्द संशोधनही महत्वाचं आहे. चिकाटीने सातत्यपूर्ण केलेला अभ्यास दाखल्यांसह जगासमोर आणणं खूप महत्वाचं काम आहे.

मात्र असं काम करणारे अगदी मोजके लोक आहेत. आणि त्यात अत्यंत महत्वाचं नाव आहे डॉ. निलेश ओक यांचं. राम-कृष्णाच्या कथांबाबत तर्कशुध्द मांडणी करणं हे निलेश ओक यांचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या अभ्यासामुळेच महाभारताचं युध्द नेमकं कधी झालं यावर शिक्कामोर्तब झालं.

केमिकल इंजिनीअर ते इतिहास संशोधक

डॉ. निलेश ओक हे मूळचे कोकणातले. त्यांची सगळी जडणघडण याच लाल मातीतली. त्यांचे आईवडील शिक्षक होते. त्यांचं सगळं शिक्षण मराठी माध्यमात झालं. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड होती. अगदी छोट्याशा खेड्यातला मुलगा ते इंजिनीअर आणि नामांकित कंपनीतील उच्च पदस्थ अधिकारी ते  जगप्रसिध्द संशोधक, व्याख्याता हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

ते केमिकल इंजिनीअर आणि एमबीए आहेत. पण तर्कशुध्द मांडणी करणारे आधुनिक इतिहासकार अशी त्यांची मुख्य ओळख आहे. इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांची पॅशन आहे, असं म्हणायला हरकत नाही.

त्यामुळेच राम कृष्णाबद्दलचे अनेक प्रश्न त्यांनाही पडले तरी ते फक्त तिथेच थांबले नाहीत. तर त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केली. त्यासाठीचे दाखले, पुरावे शोधण्यासाठी संशोधन सुरु केलं. इतिहास ही वस्तुस्थितीवर आधारित मार्गदर्शक पुस्तिका आहे, असं ते मानतात. त्यामुळे भारताच्या समृध्द सांस्कृतिक परंपरेतील काही हरवलेले धागे खगोलशास्त्राच्या आधारे शोधण्याचं महत्वाचं काम डॉ. निलेश ओक करत आहेत. 

डॉ. ओक याचं महाभारतातील तपशीलांवरील पुस्तक

खगोलशास्त्राद्वारे पारंपरिक गृहितकांना छेद

महाभारताचा कालखंड जवळपास 7  हजीर वर्षांपूर्वीचा आहे, असं डॉ. ओक यांच्या संशोधनावरुन सिध्द होतं. तर रामायण कालखंड 14 हजार  वर्षांपूर्वी घडलं, असं त्यांचं म्हणणं आहे. पारंपरिक गृहीतकांना छेद देणारे हे दावे सिध्द करण्यासाठी त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास करुन त्याचे दाखले दिले आहेत.

कृष्णाची द्वारका समुद्रात बुडाली असं म्हटलं जातं.  त्यानंतर अरबी समुद्रात काही भूगर्भीय बदल झाले का, प्राचीन भारत आणि दक्षिण अमेरिकेतील नेमका संबंध काय यावरचं त्यांचं संशोधन एक वेगळाच दृष्टीकोन उघड करतं. इतिहासाचा, पुराणांचा अभ्यास ही डॉ. निलेश ओक यांची पॅशन आहे.

कुतुहलाचा पॅशनने पाठपुरावा केला तर त्यामुळे पुराव्यांवर आधारित संशोधन सिध्द होतं हे डॉ. ओक यांनी दाखवून दिलं आहे. 2011 मध्ये त्यांचं पहिलं पुस्तक ‘When did the Mahabharata Happen?’ हे प्रकाशित झालं. या पुस्तकानं अनेकांना आश्चर्यचकित केलं.

प्राचीन ग्रंथ आणि विज्ञानाची सांगड

अमेरिकेतील उत्तम नोकरी सोडून हे खगोलशास्त्रीय पुरावे शोधण्याचं वेड का लागलं हा प्रश्न पडतोच. कुतूहल आणि जिज्ञासा ही त्यामागची मुख्य कारणं आहेत असं ते सांगतात. 2013 मध्ये त्यांनी पूर्ण वेळ पगाराची नोकरी सोडली आणि संशोधन सुरु केलं. प्राचीन ग्रंथांचा अभ्यास असा हा प्रवास नव्हता तर विज्ञानाबद्दलची प्रचंड आवड या दृष्टीने हा प्रवास सुरु झाला.

क्वांटम मॅकेनिक्समध्ये त्यांनी बरंच काम केलं आहे. याच विषयावर त्यांनी काही रिसर्च पेपर्सही सादर केले. पण तरीही ते खगोलशास्त्राकडे वळले. त्यांचा विज्ञानाधारित दृष्टीकोन आपल्याला आपल्याच इतिहासाकडे बघण्याची नवीन दृष्टी देतात. पण अगदी लहानपणापासूनच त्यांना भगवद्गीतेची आवड होती. कॅनडामध्ये थिसीस पूर्ण केल्यानंतर त्यांच्याकडे 15 दिवसांचा वेळ होता. त्यावेळेस ते तिथल्या लायब्ररीमध्ये गेले आणि केवळ कुतुहलापोटी विश्वपर्वाचं पुस्तक उघडलं. भगवद्गीता महाभारतात नेमकी कधी येते या प्रश्नाचं उत्तर खरंतर त्यांना शोधायचं होतं. पण त्यापूर्वीच अनेक गोष्टी म्हणजे खगोलशास्त्रीय पुरावे त्यांना आढळले.

अर्थातच हे सगळं चकित करणारं होतं. यानंतर बराच काळ गेला. दरम्यानच्या काळात बरंच काही वाचन झाल्यावर त्यांना हे सगळं विस्कळीत असल्याचं लक्षात आलं.

महाभारतातले जवळपास 300 पुरावे एकत्र आणून त्यांनी ते जिगसॉ पझलसारखे सोडवले. त्यातून महाभारत 7500 वर्षांपूर्वी घडल्याचं समोर येतं, असं त्यांनी सिध्द केलं. महाभारत झालं का हे दाखवायचं होतं पण त्यासाठी महाभारत घडलंच नाही असा एकतर्फी दृष्टीकोन समोर ठेवून त्यांनी संशोधन केलं नाही. कारण अशा एकतर्फी भूमिकेमुळे विज्ञानाचा किंवा सत्याचा शोध लावू शकत नाही, असं डॉ. ओक यांना वाटतं. खगोलशास्त्रीय पुरावे मिळाल्यानंतर ते त्यावेळचे आहेत हे लक्षात ठेवूनच त्यांनी पुढचं संशोधन केलं. 

श्लोकाच्या अर्थासाठी 15 वर्ष

सप्तर्षींसंदर्भात संशोधन करताना आवश्यक त्या श्लोकाचा अर्थ लावण्यासाठी त्यांना 1994 ते 2009 इतका 15 वर्षांचा कालावधी लागला. पण हा अर्थ लागल्यामुळे पुढे अगदी वेगानं त्यांचं संशोधन झालं आणि महाभारतातल्या कालखंडाबाबतचे 300 खगोलशास्त्रीय पुरावे मिळवण्यात ते यशस्वी झाले. महाभारताच्या युध्दानंतर 36 वर्षांनी कृष्णाची द्वारका बुडाली असं महाभारतात म्हटलं आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये बघता बघता ही द्वारका बुडाली अशी अनेक वर्णनं आपण वाचलेली आहेत. द्वारकेबद्दलही त्यांनी महत्वाचं संशोधन केलं आहे.

विज्ञानाधारे संशोधनावर काहींचे आक्षेप

रामायण आणि महाभारतात सात हजार वर्षांचं अंतर आहे असं त्यांना लक्षात आलं. महाभारताप्रमाणेच रामायणातही त्यांनी खगोलशास्त्रीय पुरावे मिळवले. रामायणात जवळपास 600 पुरावे आहेत. पण महाभारताप्रमाणे त्यातल्या काळाचा शोध लावणं इतकं सोपं नव्हतं. महाभारताचं युध्द हीच सगळ्यात मोठी घटना होती. त्यामुळे ते जास्त आव्हानात्मक होतं.

रामायण 10000 BC ते 14000BC या चार हजार वर्षांच्या काळात झालं हे त्यांनी खगोलशास्त्राच्या आधारे सिध्द केलं. रामायणात रामाची जन्मतारीख नेमकी काय, वनवासासाठी 14 वर्षांचाच कालखंड का निवडला, रामसेतूचा उल्लेख नेमका कसा आणि कुठे येतो याबद्दलही त्यांनी अचूक माहिती शोधली. इतकंच नाही आजची श्रीलंका म्हणजे लंका नाही असा दावाही त्यांनी केला. त्यासाठी वाल्मिकी रामायण, सूर्यसिध्दांत अशांच्या आधारे अभ्यास सादर केला.

डॉ. ओक यांचं संशोधन इतिहास, संस्कृतीशी निगडीत असल्याने अर्थातच त्यांना विरोधही सहन करावा लागला. सोशल मिडीयावर विरोधकांनी बदनामी करण्याचा प्रयत्नही केला. पण डॉ. ओक यांनी आपलं संशोधन, काम सुरुच ठेवलं. डॉ. ओक यांचं संशोधन आणि अभ्यास फक्त रामायण-महाभारतापुरताच मर्यादित नाही. तर संपूर्ण भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी अभ्यास करुन अनेक महत्वाचे पुरावे, दाखले समोर आणले आहेत.

जगभरात भारतीय संस्कृतीवर विज्ञाननिष्ठ व्याख्याने 

आतापर्यंत त्यांनी  When did Mahabharata Happen: The Mystery Of Arundhati, The historic Rama आणि Bhishma Nirvana ही तीन पुस्तकं लिहीली आहेत. भारतीय संस्कृती, रामायण-महाभारत या विषयांवर व्याख्यानं देण्यासाठी त्यांना जगभरातील कॉलेजेस आणि विद्यापिठांमध्ये तसंच विविध नामांकित संस्थांच्या वतीने आमंत्रित केलं जातं.

खगोलशास्त्र हे अत्यंत अचूक विज्ञान आहे. त्यामध्ये जर-तरला जागाच नाही असा डॉ. ओक यांचा ठाम विश्वास आहे. भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीनता आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो. भविष्यात डोकावताना या इतिहासाची पाळंमुळं किती खोलवर आणि घट्ट रुजली आहेत याची माहिती होणं आवश्यक आहेत. हेच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्वाचं काम डॉ. निलेश ओक करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ