वेड लावणारी गंधकथा

Perfumes : अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या अत्तराचा गंध....प्रत्येक गंधाची आपली अशी कहाणी असतेच.
[gspeech type=button]

इत्र किंवा अत्तर.. हा शब्द उच्चारता क्षणी मनातल्या मनातही कित्येक सुगंधी आठवणी जाग्या झाल्या असतील, हो ना? तसं होणं साहजिकच आहे. आपल्या मुख्य पाच संवेदनांपैकी एक आहे ते म्हणजे गंधज्ञान. आणि अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या अत्तराचा गंध….प्रत्येक गंधाची आपली अशी कहाणी असतेच. संपूर्ण जगात विविध प्रकारची अत्तरे वापरली जातात. आशिया खंडातली अत्तरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यातही भारतीय अत्तर परंपरेचा इतिहास तर फारच रोचक आहे.  

औषधोपचार करण्यासाठी उपयोग

आपल्याला आश्चर्य वाटेल, पण सिंधू संस्कृतीत अत्तर आणि सुगंधी द्रव्ये यांचा उल्लेख आहे. चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यासारख्या आयुर्वेद ग्रंथांमध्ये अत्तराच्या सुरुवातीच्या अर्कशाळांचा उल्लेख आहे. भारतीय संदर्भानुसार अत्तरांचा उपयोग प्रामुख्याने औषधोपचार करण्यासाठी केला जात असे. ही अत्तरे पारंपारिक आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याच्या उपचारांचा चांगला गुण यावा म्हणून वापरली जात. शरीर-मनावर या अत्तरांचा सकारात्मक प्रभाव पडतो अशी जुन्या आयुर्वेद वैद्यांची धारणा होती. याखेरीज वराहमिहिर यांनी लिहिलेल्या ‘बृहत संहिता’ या ग्रंथात अत्तराशी संबंधित अनेक संदर्भ आहेत. 

अत्तरासाठी स्वतंत्र विभाग

सोळाव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या मुघल साम्राज्याचा भारतातील शासन काळात अत्तराच्या लोकप्रियतेत आणि प्रसारास वाढ झाली. विविध मुघल सम्राट आणि त्यांच्या राण्यांना अत्तराचा सुगंध आवडायचा. मुघल सम्राटांकडे अत्तरासाठी स्वतंत्र विभाग असत आणि त्यांनी उच्च दर्जाच्या अत्तर निर्मितीला प्रोत्साहन दिले. 

‘सुगंधी राजधानी’

कन्नौजला पूर्वीपासून भारताची ‘सुगंधी राजधानी’ म्हटले जाते. कन्नौजमध्ये बनवलेल्या अत्तरांना मोठी मागणी होती. ही अत्तरं भारतातील इतर प्रदेशात आणि बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केली जात असत. 

कन्नौज हे आग्र्यापासून चार तासांच्या अंतरावर असलेले शहर आहे. एकेकाळी अवधच्या नवाबांच्या राजवटीखाली असलेल्या ऐतिहासिक लखनौपासून सुमारे दोन तासांच्या अंतरावर आहे. 

अनेक लहान भारतीय शहरांप्रमाणे कन्नौज हे भूतकाळ आणि वर्तमान यांच्यामध्ये कुठेतरी अडकले आहे. येथे पारंपारिक पद्धतीने अत्तर बनवले जाते. संपूर्णपणे नैसर्गिक अशा फुलं, औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करून अत्तरं बनवली जातात. धार्मिक विधी, सौंदर्य प्रसाधने आणि सुगंधांमध्ये मुख्य करून अत्तर वापरले जाते. 

या अत्तरांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता वनस्पतीजन्य तेलांमध्ये ही तयार केली जातात. उदा. चंदन किंवा जैतून (ऑलिव्ह ऑईल) यासारख्या तेलात ही अत्तरं बनवली जातात. 

गुलाब, चमेली आणि चंदनाचा सुवास

पारंपरिक पद्धतीनुसार अत्तर तयार करण्यासाठी ‘डेग’ म्हणून ओळखले जाणारे एक मोठ्या आकाराचे, रुंद तोंडाचे तांब्याचे भांडे वापरले जाते. याचा उपयोग फुले, औषधी वनस्पती आणि इतर नैसर्गिक घटकांचा अर्क गाळण्यासाठी केला जातो. ऊर्ध्वपातनाची ही प्रकिया अनेक तास सुरू असते. त्यानंतर शेवटी अतिशय उच्च दर्जाचे सुगंधी अत्तर मिळते. या अत्तरांच्या सुवासानंतर एवढ्या दीर्घ प्रक्रियेचे चीज झाल्यासारखे वाटते. 

अत्तर उत्पादन हा भारतात अजूनही चांगला चालणारा व्यवसाय आहे. अनेक लघु-उत्पादक अजूनही  सुगंधित अत्तर-तेल तयार करण्यासाठी जुन्या पद्धतीचे तंत्र वापरतात. गुलाब, चमेली आणि चंदन ही सर्वात प्रसिद्ध भारतीय अत्तरे आहेत. 

अत्तरांचा औषधी उपयोग  

अरोमाथेरपी : अत्तर हे एक नैसर्गिक तेल असते, ज्याचा उपयोग मूड सुधारण्यासाठी, मनावरचा ताण तणाव कमी करण्यासाठी आणि शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी अरोमाथेरपी (सुगंधोपचार) केली जाते. यासाठी आवश्यक त्या अत्तरांचा वापर केला जातो. 

उदाहरणार्थ, लव्हेंडर अत्तर हे anxiety आणि insomnia या आजारावर गुणकारी ठरते, तर गुलाबाच्या अत्तराने मूड सुधारुन उत्साह वाटू शकतो.

Astringent आणि जंतुनाशक (Antiseptic)

डोकेदुखी आणि पोटदुखीवर उपचार करण्यासाठी चंदनाच्या अत्तरचा वापर Astringent आणि जंतुनाशक म्हणून केला जाऊ शकतो. अर्थात तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याने हे उपचार करावेत. 

रोजच्या वापरासाठी सुगंध

अत्तर हे आपण परिधान केलेल्या कपड्यावर किंवा थेट त्वचेवर सुद्धा लावता येते. त्याचा सुगंधही दीर्घकाळ टिकतो. आपल्या रुमालावरसुद्धा त्यांचे काही थेंब लावल्यावर दिवसभर आपण अत्तराचा सुगंध घेऊ शकतो. 

2 Comments

  • sudhir tulangekar

    खूप छान माहिती

  • स्वरदा नाईक

    हीना…अत्तर कानाच्या व्याधी काही प्रमाणात कमी करते. कान दुखी कमी होते… म्हणून पूर्वी अत्तराचा फाया कानात ठेवत असत….(मी वाचलेल्या/ऐकलेल्या माहिती नुसार हं)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 Responses

  1. हीना…अत्तर कानाच्या व्याधी काही प्रमाणात कमी करते. कान दुखी कमी होते… म्हणून पूर्वी अत्तराचा फाया कानात ठेवत असत….(मी वाचलेल्या/ऐकलेल्या माहिती नुसार हं)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ