दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ
मुंबई – 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
जालना – शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात
सांगली – आदिती फुडसला शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज; आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबई – माजी आमदार राजन साळवी शिवसेना शिंदे गटामध्ये करणार प्रवेश; दुपारी तीन वाजता ठाण्यातील कार्यालयात होणार पक्षप्रवेश कार्यक्रम
दिल्ली – सोयाबीन खरेदीच्या कालावधीत मुदतवाढ करावी यासाठी संसदेच्या परिसरात महाविकास आघाडीतील खासदारांचं आंदोलन
पॅरिस – एआय परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमध्ये दाखल
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा विकास नियोजनाची ऑनलाइन बैठक; शिवसेना गटाचे आमदार अनुपस्थितीत असल्याची माहिती
डिफरटंली एबल!
गिरीश शर्मा यांनी लहानपणी ट्रेन अपघातात आपला एक पाय गमावला. पण या घटनेने त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला नाही. ते एक कर्तृत्ववान बॅडमिंटन खेळाडू बनले. त्यांच्याकडे एकच पाय आहे, पण त्यांच्या एका पायाची शक्ती इतकी जास्त आहे की, ते सहजपणे संपूर्ण कोर्ट कव्हर करत खेळतात.
शेखर नाईक हे त्यांच्या दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणामुळे टी20 ब्लाइंड क्रिकेट विश्वचषकचे विजेते बनले. त्यांच्या नावावर 32 शतके आहेत. अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत ते पुढे आले आहेत.
रमाकृष्णन अडिच वर्षाचे असताना त्यांच्या दोन्ही पायांना पोलियो झाला होता. शाळेत प्रवेश नाकारण्यापासून ते नोकरी नाकारण्यापर्यंत, रमाकृष्णनला त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला. तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ४० वर्षे पत्रकार म्हणून काम केलं आणि सध्या एसएस म्युझिक टेलिव्हिजन चॅनेलचे सीईओ आहेत. ते एक संगीतकार देखील आहेत
प्रीती श्रीनिवासन या तमिळनाडू महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार होत्या. दुर्दैवाने स्विमिंग करताना गळ्याखाली पॅरलाईझ झाल्यानंतरही त्या आपली संस्था सोल फ्रीद्वारे इतरांना प्रेरणा देत आहेत. गंभीर अपंगत्व असलेल्या महिलांना आशा देण्यास त्यांनी सुरुवात केली.
नऊ महिन्यांचे असताना सत्येंद्र सिंह यांना पोलियो झाला. आज ते एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि अपंगत्वाविरुद्ध काम करतात. अनेक सार्वजनिक ठिकाणे अपंगांसाठी योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ते काम करत आहेत. तसचं त्यांनी इन्फिनिट अॅबिलिटी नावाचा एक संस्थाही स्थापन केली आहे.
अरुणिमा सिन्हा यांना एका चोरट्याने चालत्या ट्रेनमधून ढकलल्याने त्यांना आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर दोन वर्षांनी माउंट एवरेस्ट चढणारी पहिली अपंग महिला हा मान अरुणिमा यांनी मिळवला. कृत्रिम पायांनी त्यांनी आव्हाने पार करत एक इतिहास घडवला.
मालती कृष्णमूर्ती होल्ला यांना लहानपणी खूप जास्त तापामुळे त्यांना पूर्णपणे लुळेपणा आला. त्यांच्या शरीराचा वरचा भाग हा काही प्रमाणात बरा झाला मात्र कंबरेखालचा भाग कमकुवतच राहिला. या अडचणींना तोंड देत त्यांनी खेळांमध्ये स्वतःला सिद्ध केलं. आज त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात. त्यांनी अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत आणि अनेक पुरस्कारांनीही सन्मानित झाल्या आहेत. त्या ग्रामीण भागातील अपंग मुलांना मदत करण्यासाठी काम करतात.
लहानपणी पोलियो झाल्यामुळे डॉ. सुरेश अडवाणी व्हिलचेअरवर आहेत. पण त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधीच अडथळा बनू दिले नाही. ते भारतातील एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक यशस्वी बोन-मॅरो ट्रान्सप्लांट केले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2002 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2012 मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
रजिंदर सिंह रहेलू यांना लहानपणीच पोलियो झाल्यामुळे ते चालू शकत नाहीत. हायस्कूलनंतर त्यांनी पुढील शिक्षण थांबवलं. त्यानंतर त्यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत घेत ते यशस्वी झाले आणि 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
साधना धांड यांना brittle bone हा हाडांचा आजार आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची ऐकण्याची क्षमता गेली आणि त्यांची उंची फक्त 3.3 फूट आहे. पण त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधीच अडथळा बनू दिले नाही. त्यांनी चित्रकला शिकली आणि अनेक पुरस्कार जिंकले. आता त्या इतर विद्यार्थ्यांनाही चित्रकला शिकवतात. त्या एक समाजसेविकाही आहेत आणि अपंग मुलांना मदत करणाऱ्या संस्थांना मदत करतात.
गिरीश शर्मा यांनी लहानपणी ट्रेन अपघातात आपला एक पाय गमावला. पण या घटनेने त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का बसला नाही. ते एक कर्तृत्ववान बॅडमिंटन खेळाडू बनले. त्यांच्याकडे एकच पाय आहे, पण त्यांच्या एका पायाची शक्ती इतकी जास्त आहे की, ते सहजपणे संपूर्ण कोर्ट कव्हर करत खेळतात.
शेखर नाईक हे त्यांच्या दृढ इच्छाशक्ती आणि समर्पणामुळे टी20 ब्लाइंड क्रिकेट विश्वचषकचे विजेते बनले. त्यांच्या नावावर 32 शतके आहेत. अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत ते पुढे आले आहेत.
रमाकृष्णन अडिच वर्षाचे असताना त्यांच्या दोन्ही पायांना पोलियो झाला होता. शाळेत प्रवेश नाकारण्यापासून ते नोकरी नाकारण्यापर्यंत, रमाकृष्णनला त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला. तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी ४० वर्षे पत्रकार म्हणून काम केलं आणि सध्या एसएस म्युझिक टेलिव्हिजन चॅनेलचे सीईओ आहेत. ते एक संगीतकार देखील आहेत
प्रीती श्रीनिवासन या तमिळनाडू महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार होत्या. दुर्दैवाने स्विमिंग करताना गळ्याखाली पॅरलाईझ झाल्यानंतरही त्या आपली संस्था सोल फ्रीद्वारे इतरांना प्रेरणा देत आहेत. गंभीर अपंगत्व असलेल्या महिलांना आशा देण्यास त्यांनी सुरुवात केली.
नऊ महिन्यांचे असताना सत्येंद्र सिंह यांना पोलियो झाला. आज ते एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि अपंगत्वाविरुद्ध काम करतात. अनेक सार्वजनिक ठिकाणे अपंगांसाठी योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी ते काम करत आहेत. तसचं त्यांनी इन्फिनिट अॅबिलिटी नावाचा एक संस्थाही स्थापन केली आहे.
अरुणिमा सिन्हा यांना एका चोरट्याने चालत्या ट्रेनमधून ढकलल्याने त्यांना आपला पाय गमवावा लागला. त्यानंतर दोन वर्षांनी माउंट एवरेस्ट चढणारी पहिली अपंग महिला हा मान अरुणिमा यांनी मिळवला. कृत्रिम पायांनी त्यांनी आव्हाने पार करत एक इतिहास घडवला.
मालती कृष्णमूर्ती होल्ला यांना लहानपणी खूप जास्त तापामुळे त्यांना पूर्णपणे लुळेपणा आला. त्यांच्या शरीराचा वरचा भाग हा काही प्रमाणात बरा झाला मात्र कंबरेखालचा भाग कमकुवतच राहिला. या अडचणींना तोंड देत त्यांनी खेळांमध्ये स्वतःला सिद्ध केलं. आज त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात. त्यांनी अनेक सुवर्ण पदके जिंकली आहेत आणि अनेक पुरस्कारांनीही सन्मानित झाल्या आहेत. त्या ग्रामीण भागातील अपंग मुलांना मदत करण्यासाठी काम करतात.
लहानपणी पोलियो झाल्यामुळे डॉ. सुरेश अडवाणी व्हिलचेअरवर आहेत. पण त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधीच अडथळा बनू दिले नाही. ते भारतातील एक प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ आहेत आणि त्यांनी अनेक यशस्वी बोन-मॅरो ट्रान्सप्लांट केले आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2002 मध्ये त्यांना पद्मश्री आणि 2012 मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
रजिंदर सिंह रहेलू यांना लहानपणीच पोलियो झाल्यामुळे ते चालू शकत नाहीत. हायस्कूलनंतर त्यांनी पुढील शिक्षण थांबवलं. त्यानंतर त्यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कठोर मेहनत घेत ते यशस्वी झाले आणि 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले.
साधना धांड यांना brittle bone हा हाडांचा आजार आहे. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची ऐकण्याची क्षमता गेली आणि त्यांची उंची फक्त 3.3 फूट आहे. पण त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधीच अडथळा बनू दिले नाही. त्यांनी चित्रकला शिकली आणि अनेक पुरस्कार जिंकले. आता त्या इतर विद्यार्थ्यांनाही चित्रकला शिकवतात. त्या एक समाजसेविकाही आहेत आणि अपंग मुलांना मदत करणाऱ्या संस्थांना मदत करतात.