रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Ratnagiri : कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करणे, राज्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठीचे धोरण करण्याबाबतचा मुद्दा  भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला. तर आमदार शेखर निकम यांनी राज्यातील 78 वरिष्ठ महाविद्यालयांना 100  टक्के अनुदान मंजूर करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

रत्नागिरी जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 334

गुहागर मतदारसंघांचे शिवसेनेचे आमदारा भास्कर जाधव यांनी सर्वाधिक 142 प्रश्न 14 व्या विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केले आहेत. 

या प्रश्नांमध्ये धोरण निर्मितीच्या विषयांचा समावेश आहे. कोकणासाठी स्वतंत्र पर्यटन विकास महामंडळ स्थापन करणे, राज्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठीचे धोरण करण्याबाबतचा मुद्दा  भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेला. तर आमदार शेखर निकम यांनी राज्यातील 78 वरिष्ठ महाविद्यालयांना 100  टक्के अनुदान मंजूर करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

 

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 भास्कर  जाधव शिवसेना, जून 2022 पासून ठाकरे गट गुहागर 142
2 राजन  साळवी शिवसेना, जून 2022 पासून ठाकरे गट राजापूर 97
3 शेखर  निकम राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुलै 2023 पासून अजित पवार गट चिपळूण 115
योगेश  कदम शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट दापोली 8

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत रत्नागिरी जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –

  • रत्नागिरी जिल्हयातील मौजे कळंबस्ते, निरबाडे ते मुसाड, वावे (ता. खेड) येथील पुलाच्या दुरुस्तीबाबत
  • राजापूर शहरातील जलसंपदा विभागाकडून पुनर्निरीक्षित करण्यात आलेली पूररेषा रद्द करण्याबाबत
  • जिल्ह्यात पाणी टंचाई आराखडा तयार न झाल्याबाबत
  • रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात विविध औषधांचा असलेला तुटवडा
  • चिपळूण तालुक्यातल्या तिवरे येथील धरण फुटून 23 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चिपळूण तालुक्यातील कळवंडे येथील धरणाच्या दुरूस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आल्याबाबत 
  • रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक शाळांना क्रीडांगण उपलब्ध करुन देण्याबाबत
  • रायगड, रत्नागिरी व सिंधदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या सागरी महामार्गाचे काम रखडल्याबाबत
  • रत्नागिरी जिल्हयातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या गोशाळेचे स्थलांतर करण्याबाबत
  • राज्यातील अन्य फळपीक उत्पादक जिल्ह्यांमध्ये शेती व कृषी पंपांची वर्गवारी ही ‘कृषी’ गटामध्ये असताना केवळ रत्नागिरी जिल्हयातील शेती व कृषी पंपांची वर्गवारी ही ‘अकृषीक’ गटामध्ये केली गेल्याने जिल्ह्यातील आंबा, काजू, फणस, नारळ, सुपारी बागायतदार, रोपवाटिका व्यवसायिक यांच्या शेती, कृषीपंपाची वीजबिले पूर्वीपेक्षा चारपटीने जास्त येत असल्याबाबतचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले गेले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ