14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
रायगड जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 532
रायगड जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 264
रायगड जिल्ह्यातून पनवेल मतदारसंघाचे भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी सगळ्यात जास्त 370 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत. या प्रश्नांमध्ये बालक, शालेय शिक्षण, आरोग्य या विषयांवर सर्वाधिक प्रश्न विचारले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | आदिती तटकरे
(डिसेंबर 2019 ते जून 2022 आणि जुलै 2023 पासून मंत्री) |
राष्ट्रवादी कॉंग्रेस.
जुलै 2023 पासून अजित पवार गट |
श्रीवर्धन | 84 |
2 | भरतशेठ गोगावले | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | महाड | 38 |
3 | महेंद्र दळवी | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | अलिबाग | 38 |
4 | महेंद्र थोरवे | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | कर्जत | 26 |
5 | महेश बालदी | अपक्ष | उरण | 197 |
6 | प्रशांत ठाकूर | भाजप | पनवेल | 370 |
7 | रविंद्र पाटील | भाजप | पेण | 21 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत रायगड जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- पेण अर्बन बँकेतला 758 कोटीचा घोटाळा
- रायगड जिल्हयातील पाणी टंचाई, म्हसळा तालुक्यातील चार गावात दुषित पाणीपुरवठा
- जिल्हयातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नद्यांमध्ये होत असलेले प्रदूषण
- जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनांचा लाभ सर्व घटकांना मिळणेबाबत,
- रायगड जिल्हयातील मच्छीमार संस्थांना 100 टक्के डिझेल परतावा मिळण्याबाबत
- कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सर्व शाखांमध्ये झालेला गैरव्यवहार
- पेण तालुक्यातील बाळगंगा धरणग्रस्तांचे प्रश्न मागील 13 वर्षांपासून अजूनही न सुटल्याबाबत,
- रायगडमधील तळोजा औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमार्फत रात्री अपरात्री तसेच पहाटेच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या रासायनिक दूषित वायुमुळे पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे, खारघर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याबाबत
- रिलायन्स गॅस कंपनीने रायगडमधील पेण तालुक्यातील नागोठाणेपासून कर्जत, खोपोली, खालापूर या तालुक्यातून गुजरात राज्यातील दहेजपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी जमिनी उपलब्ध करून दिलेल्या प्रकल्पबाधीत शेकडो शेतकऱ्यांना जमीन व पिकाची नुकसान भरपाई अद्यापपर्यंत दिली नसल्याबाबत,
- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात येणाऱ्या रायगड जिल्हयातील न्हावा-शिवडी सेतू प्रकल्पाच्या बांधकामामुळे न्हावा, गव्हाण, घारापुरी हद्दीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे व मच्छिमार बांधवांचे पुर्नवसन अद्यापही न झाल्या संदर्भातले प्रश्न अधिवेशनात उपस्थित करण्यात आले आहेत.