युनेस्कोकडून जागतिक वारसाचा दर्जा लाभलेलं ऐतिहासिक अहमदाबाद आणि जयपूर शहर

Ahmadabad and Jaipur : गुजरात येथील अहमदाबाद आणि राजस्थान मधील जयपूर ही दोन शहरं जागतिक वारसा दर्जा प्राप्त असलेली शहरं आहेत. या शहरांची रचना, तेथील ऐतिहासिक वास्तू, इमारती व या शहराच्या परिसरामधून तिथल्या भव्य इतिहासाची कल्पना येते. म्हणूनच या दोन शहरांचा संयुक्त राष्ट्राने जागतिक वारसा स्थानामध्ये समावेश केला आहे.
[gspeech type=button]

संयुक्त राष्ट्राकडून जगभरातील सांस्कृतिक, तंत्रज्ञान, वास्तुकला, शिल्पकला यांच्या उत्कृष्टतेचे दर्शन घडवणाऱ्या ठिकाणांचं तसेच निसर्गनिर्मित, जैवविविधता असणाऱ्या स्थळांचं जतन केलं जातं. यामध्ये केवळ वास्तू आणि स्थळांचाच समावेश नसून ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या वा ऐतिहासिक नगररचनेचं उत्तम उदाहरण असलेल्या शहरांनाही जागतिक वारसाचा दर्जा दिला जातो.

भारतातील एकूण 42 स्थळांना आणि वास्तूंना जागतिक वारसा दर्जा मिळालेला आहे. यामध्ये दोन शहरांचाही समावेश आहे. गुजरात येथील अहमदाबाद आणि राजस्थान मधील जयपूर अशी ही दोन शहरं आहेत. या शहरांची रचना, तेथील ऐतिहासिक वास्तू, इमारती व या शहराच्या परिसरामधून तिथल्या भव्य इतिहासाची कल्पना येते. म्हणूनच या दोन शहरांचा संयुक्त राष्ट्राने जागतिक वारसा स्थानामध्ये समावेश केला आहे.

अहमदाबाद

सन 1411 साली सुलतान अहमद शाह यांनी गुजरातमधून वाहणाऱ्या साबरमती नदीच्या पूर्वेकडे हे शहर वसवलं. साबरमती नदीच्या किनारी त्याकाळी मोठ्या प्रमाणावर व्यापारी उलाढाल होत असे. त्यामुळे तिकडे वेगवेगळ्या समाजातील व्यक्तिंची ये-जा असे. अर्थातच या कारणामुळे तिकडे सांस्कृतिक सरमिसळ तर होतीच. पण व्यापाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असं हे शहर होतं.

व्यापार आणि सांस्कृतिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या या शहरात वास्तुकलेच्या उत्तमोत्तम नमुना असलेल्या वास्तु आपल्याला पाहायला मिळतात. आजही या ऐतिहासिक वास्तूंचं उत्तम प्रकारे जतन केलं आहे. आणि आजही अहमदाबाद शहर गुजरातचं केंद्रस्थान आहे. त्यामुळे 8 जुलै 2017 साली या शहराला जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला.

जयपूर

जयपूर अर्थातच राजस्थाची पिंक सिटी म्हणून विशेष ओळख असलेलं हे शहर. या शहराला 6 जुलै 2019 साली जागतिक वारसाचा दर्जा दिला. 1727 साली महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी या शहराची निर्मिती केली आहे. राजा सवाई यांनी वाढती लोकसंख्या आणि पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 1727 मध्ये आपली राजधानी आमेरहून जयपूर येथे स्थलांतरित केली. त्यावेळी वास्तूविशारद विद्याधर भट्टाचार्य यांनी या शहराची रचना केली. हे शहर डोंगरावर वसवलेलं नसून सपाट मैदानी भागावर आहे. हे शहर निर्माण करताना त्यासाठी ग्रीड पद्धत वापरलेली आहे. या आगळ्या-वेगळ्या पद्धतीच्या नगर रचनेमुळे हे शहर आज ही शहर नगर नियोजन आणि मध्ययुगीन वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून गणलं जाते.

जयपूरमध्ये खगोलशास्त्रिय निरीक्षण आणि अभ्यास करण्यासाठी 18 व्या शतकाच्या सुरुवातीला जंतर-मंतर या वास्तूची निर्मिती केली. या वास्तूमध्ये साधारण खगोलशास्त्रिय निरीक्षण करणारी 20 साधनं उपलब्ध आहेत. या वास्तूचाही समावेश युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये आहे.

या दोन्ही शहरांच्या रचनेमधून आणि आजही अस्तित्वात असलेल्या या शहरातील ऐतिहासिक वास्तूंमधून तत्कालीन काळातील व्यापार, सामाजिक जीवन, सांस्कृतिक घटना संदर्भातली अनुभूती येते.

त्यामुळे तुमच्या पुढच्या सुट्टीमध्ये जागतिक वारसाचा दर्जा मिळालेल्या या शहरांना नक्कीच भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

नालासोपाराला (Nala Sopara) अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. आज हे संदर्भ काहीसे दुर्लक्षित झाले आहेत. प्राचीन भारतातलं आध्यात्मिक आणि आर्थिक तीर्थ
महाराष्ट्रातील अनेक मंदिरे (Temples) ही केवळ धार्मिक विश्वासाचे केंद्र नव्हे, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचे केंद्र देखील आहेत. या मंदिरात
नाशिक शहरात काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ