सिनेमातून समोर आलेलं ‘राजकारण’

Movies on Politics : महाराष्ट्रात येत्या पंधरा दिवसांत बहुचर्चित विधानसभा निवडणूक होणार आहेत. हा काळ बॉलीवूडच्या निर्मात्यांना खूप काही विषय देऊन जाणारा असतो. जे छोट्या पडद्यावर बातम्यांमधून कळत असतं ते राजकारण थोडे फार बदल करून मोठ्या पडद्यावर कथा म्हणून सादर करायचं धाडस काही निर्माता, दिग्दर्शकांनी आजवर केलेलं आहे. 
[gspeech type=button]

राजकारण, क्रिकेट आणि सिनेमा हे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. या तिन्ही विषयांना कोणत्याही ‘सिझन’चं बंधन नाहीये. बाराही महिने लोकांना या तिन्ही विषयांवर मनसोक्त गप्पा करण्यात, गॉसिप करण्यात प्रचंड इंटरेस्ट असतो. या तिन्ही क्षेत्रात योगदान देणारे लोक हे व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रेक्षकांसाठी खूप जवळचे असतात. सोशल मीडियामुळे तर हे अंतर अगदीच कमी केलं आहे.

निवडणुकांतून सिनेमाच्या कथा

महाराष्ट्रात येत्या पंधरा दिवसांत बहुचर्चित विधानसभा निवडणुका होणार आहेत. हा काळ बॉलीवूडच्या निर्मात्यांना खूप काही विषय देऊन जाणारा असतो. त्यामुळे घडणाऱ्या प्रत्येक राजकीय घडामोडींवर एक टीम लक्ष ठेवून असणार हे नक्की. जे छोट्या पडद्यावर बातम्यांमधून कळत असतं, ते राजकारण थोडे फार बदल करून मोठ्या पडद्यावर कथा म्हणून सादर करायचं धाडस काही निर्माता, दिग्दर्शकांनी आजवर केलेलं आहे. 

ओटीटीवर आलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेबसिरीजने सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण प्रेक्षकांना व्यवस्थितपणे समजावून सांगितलं आहे. कोणत्याही प्रेक्षकाला हे पात्र म्हणजे कोण आहे? हे सांगण्याची सिरीज बघतांना गरज भासली नसावी. 

राजकारण आणि सिनेमा

सिनेमा आणि वेबसिरीज मध्ये एक फरक आहे की, तिथे पात्र उभं करायला दिग्दर्शकाला पुरेसा वेळ मिळतो. पाहुयात या विषयांवरचे सिनेमे.

राजनीती :  2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन प्रकाश झा यांनी केलं आहे. अजय देवगण, नाना पाटेकर, रणबीर कपूर, कतरिना कैफ, अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी, नसिरुद्दीन शहा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची कथा महाभारतावर आधारित होती, असं देखील बोललं जातं. हा सिनेमा पूर्ण बघायला, तो कळायला तुम्हाला राजकारणाची आवड, जाण असावी लागते. ‘राजनीती’ हा ज्या प्रेक्षकांनी डोळ्यांसोबतच डोक्याने बघितला त्यांना तो फार आवडला. कतरिना कैफने या सिनेमात साकारलेली ‘इंदू’ चं पात्र हे काँग्रेस पक्षप्रमुख सोनिया गांधी यांच्यासारखं होतं, असा दावा काही कार्यकर्त्यांनी केला होता. पण, दिग्दर्शकाने तो दावा फेटाळून लावला होता. 

एका पक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने सरकार पडणं, खुर्चीच्या मोहापायी एकमेकांच्या जीवावर उठणं, एका महिलेला सत्तेत टिकून राहण्यासाठी आपल्या तत्वांशी करावी लागणारी तडजोड हे प्रेक्षकांना क्लिक झालं होतं. 

इंदू सरकार: 2017 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकिर्दीवर आधारित आहे. मधुर भांडारकर या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहेत. 1975 ते 1977 या काळात भारतावर लादल्या गेलेल्या ‘आणीबाणी’ची परिस्थिती नव्या पिढीला कळावी यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आला होता. कीर्ती कुलहारी या अभिनेत्रीने या सिनेमात ‘इंदिरा गांधी’ यांची भूमिका साकारली होती. संजय गांधी यांच्या भूमिकेत दिसलेला नील नितीन मुकेश हे या सिनेमाचं सरप्राईज पॅकेज होतं. 

या सिनेमाची मोठी आवृत्ती म्हणून कंगना रनौतने देखील हाच विषय घेऊन, इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहे.

थलायव्ही: 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात कंगना रनौतने तामिळनाडूच्या सलग 5 वेळेस मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेल्या ‘जयललिता’ (अम्मा) यांची भूमिका साकारली होती. आधी अभिनेत्री, मग राजकारणात प्रवेश, मुख्यमंत्री ते राज्यसभा सदस्य, तामिळनाडूच्या विधानसभेत झालेला अपमान हे सर्व अडीच तासांत दिग्दर्शकाने कव्हर केलं होतं. 24 फेब्रुवारी म्हणजे जयललिता यांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. 

ठाकरे: शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा अभिजित पानसे यांनी दिग्दर्शित केला होता. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत प्रदर्शित झालेल्या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी शीर्षक भूमिका साकारली होती. अमृता राव हिने ‘मातोश्री’ मीनाताई ठाकरे यांची भूमिका साकारली होती. अरविंद जगताप यांनी या सिनेमाचं लेखन केलं होतं. बाळासाहेबांचं तरुणपणीचं कोलकत्ता येथील राहणं, मुंबईला परत येऊन मराठी माणसांसाठी झटणं, शिवसेनेची स्थापना, बाबरी मस्जिद सारख्या सर्व घटनांचा या सिनेमात समावेश करण्यात आला होता. 

अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : 2014 ते 2024 या काळात भारताचे पंतप्रधानपद भूषवणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा हा सिनेमा होता. नितीश कदम यांची कथा असलेल्या या सिनेमात अनुपम खेर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. अनुपम खेर यांनी ही भूमिका साकारताना अंगिकारलेली देहबोली ही प्रेक्षकांना आवडली होती. 

आर्टिकल 370 : भारतावर, काश्मीरवर वर्षानुवर्षे लादलेलं ‘आर्टिकल 370’ हे भारतीय जनता पार्टीने बहुमताने कसं काढून टाकलं हे या सिनेमात थोडी सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन दाखवण्यात आलं आहे. यामी गौतम, प्रियामणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेतील अरुण गोविल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेतील किरण करमरकर या सर्वांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं होतं. आपल्या घटनेची प्रेक्षकांना माहिती देणारे आर्टिकल 15 आणि आर्टिकल 375 हे चित्रपट देखील ओटीटीवर चांगलेच लोकप्रिय आहेत. 

धर्मवीर : कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा दोन भागात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित या दोन्ही सिनेमात प्रसाद ओक यांनी शीर्षक भूमिका साकारली होती. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने 25 कोटी इतकी कमाई करत त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणून मान मिळवला होता. या सिनेमाचा भाग 2 देखील यावर्षी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील झलक बघायला मिळाली होती. 

राजकीय पक्षाचा सिनेमा हा देखील नवा ट्रेंड नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ या सिनेमातून बघायला मिळत आहे. मनोरंजन आणि राजकारण यांच्यात झालेली ही युती भविष्यात किती वर्ष आपलं सरकार टिकवेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ