जळगाव जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (195)  प्रश्न हे रावेर मतदारसंघांचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी विचारले आहेत. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघांचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात एकही प्रश्न सभागृहात विचारला नाही आहे. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

जळगाव जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या : 716

जळगाव जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 50

 

जळगाव जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (195)  प्रश्न हे रावेर मतदारसंघांचे काँग्रेस आमदार शिरीष चौधरी यांनी विचारले आहेत. तर जळगाव ग्रामीण मतदारसंघांचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात एकही प्रश्न सभागृहात विचारला नाही आहे. 

जळगाव जिल्ह्यातून बालकांचे आरोग्य, शिक्षण याशिवाय कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी वा पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण शुल्क माफ करण्याबाबत, कोरोना काळात कार्यरत असलेल्या आशा सेविकांचे प्रलंबित मानधन अदा करण्याबाबत तसेच यावल तालुक्यातील माय सांगवी (सांगवी खुर्द) येथे एका अल्पवयीन मुलीकर करण्यात आलेल्या सामुहिक अत्याचारा संबंधीत प्रश्न सभागृहात मांडण्यात आला होता. 

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

 

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 अनिल पाटील, जुलै 2023 पासून मंत्री राष्ट्रवादी काँ. जुलै 2023 पासून अजित पवार गट  अमळनेर 122
2 चंद्रकांत  पाटील शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट  मुक्ताईनगर 143
3 चिमणराव पाटील शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट  एरंडोल 19
4 गिरीश  महाजन, मंत्री, जून 2022 पासून  भाजप जामनेर
गुलाबराव रघुनाथ पाटील (2019 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही).  शिवसेना जळगाव ग्रामीण 0
6 किशोर  पाटील शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट  पाचोरा 62
7 लता  सोनवणे शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट  चोपडा (अ.ज. जा ) 73 
मंगेश  चव्हाण भाजप चाळीसगाव 129
9 संजय  सावकारे भाजप भुसावळ (अ.जा.) 113 
10  शिरीष  चौधरी काँग्रेस रावेर 195
11  सुरेश  भोळे भाजपा जळगाव-शहर 125 

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत जळगाव जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

 

  • जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये होत असलेला गैरव्यवहार 
  • जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांवर बारा अंकी बारकोड नसल्यामुळे धान्याचा लाभ मिळत नसल्याबाबत
  • भुसावळ शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी
  • जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांचा खंडित विज पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत, 
  • रावेर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत असलेल्या वैयक्तिक व सामुहिक शौचालये योजनांमध्ये झालेल्या अपहाराबाबत
  • विविध ठिकाणची रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे
  • जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प इ. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ