14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
अहमदनगर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 1067
अहमदनगर जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 59
अहमदनगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक 395 प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल आ. रोहित पवार यांनी 289 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी उत्तम प्रकारे सभागृहात विविध विषयावरील प्रश्न विचारले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांची मोठ्या प्रमाणात झालेली पडझड, कातकरी आणि अन्य आदिवासींच्या मुलांना वेठबिगारी करायला लावण्यतून निर्माण होणार्या समस्या, अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईकराव यांनी पेटत्या लाकडाने केलेली अमानुष मारहाण, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे प्रश्न गेल्या पाच वर्षातील अधिवेशनात उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री, जुलै 2022 पासून | भाजप | शिर्डी | 199 |
2 | निलेश लंके, मे 2024 पर्यंत आमदारपदी | राष्ट्रवादी काँ, शरद पवार गट | पारनेर | 158 |
3 | रोहित पवार | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून शरद पवार गट | कर्जत जामखेड | 289 |
4 | संग्राम जगताप | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | अहमदनगर शहर | 44 |
5 | बबनराव पाचपुते | भाजप | श्रीगोंदा | 9 |
6 | लहु कानडे | काँग्रेस | श्रीरामपूर | 205 |
7 | मोनिका राजळे | भाजप | शेवगाव | 95 |
8 | आशुतोष काळे | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | कोपरगाव | 17 |
9 | डॉ. किरण लहामटे | राष्ट्रवादी कॉं, जुलै 2023 पासून शरद पवार गट | अकोले | 46 |
10 | प्राजक्त तनपुरे, मंत्री, जून 2022 पर्यंत | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून शरद पवार गट | राहुरी | 38 |
11 | शंकरराव गडाख, मंत्री, जून 2022 पर्यंत | क्रांतिकारी शेतकरी पार्टी | नेवासा | 4 |
12 | बाळासाहेब थोरात, मंत्री जून 2022 पर्यंत | काँग्रेस | संगमनेर | 395 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- श्रीगोंदा येथे स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबत
- अकोले मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मधील घेतलेल्या कामात ठेकेदाराकडून होत असलेली दिरंगाई
- सन 2018-19 व 2019 – 20 या वर्षात अहमदनगर जिल्ह्याचा टंचाई आराखडा अंमलात आणण्यातील समस्या
- जिल्ह्यातील मुळा, प्रवरा व गोदावरी नदीपात्रातून होत असलेली अवैध वाळू तस्करी
- संगमनेर तालुक्यातील कारखान्यांमुळे प्रवरा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याबाबत
- जिल्हयात बेकायदा गुटखा आणि मावा निर्मिती होऊन विक्री होत असल्याबाबत
- जिल्हा परिषदेतील विकास कामांसाठीचा मंजूर निधी अखर्चित राहिल्याबाबत