14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
अमरावती जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 800
अमरावती जिल्ह्यासंबंधीत विचारलेले प्रश्न : 126
अमरावती जिल्ह्यातुन पहिल्यांदाच विधानसभेत निवडून गेलेल्या आमदार सुलभा खोडके यांनी सगळ्यात जास्त (341) प्रश्न विचारले आहेत. तर मेळघाट मतदारसंघांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी (14) प्रश्न विचारले आहेत.
आधी काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर या एकमेव महिला आमदार होत्या. चौदाव्या विधानसभा निवडणूकीत सुलभा खोडके या अमरावती मतदारसंघांतून विजयी झाल्याने अमरावती जिल्ह्यात दोन महिला आमदार आहेत.
अमरावती जिल्ह्यातून शालेय शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांमध्ये जिल्ह्यातल्या 14 तालुक्यातील जिल्हापरिषदेच्या 186 शाळेंच्या दुरावस्थेचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला आहे.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | सुलभा खोडके | काँग्रेस | अमरावती | 341 |
2 | बळवंत वानखेडे | काँग्रेस | दर्यापूर | 274 |
3 | देवेंद्र भूयार | स्वाभिमानी पक्ष | मोर्शी | 49 |
4 | प्रताप अडसड | भाजप | धामणगाव रेल्वे | 21 |
5 | राजकुमार पटेल | प्रहार जनशक्ती | मेळघाट | 14 |
6 | रवी राणा | अपक्ष | बडनेरा | 121 |
7 | यशोमती ठाकूर (मंत्री, जून 2022 पर्यंत ) | काँग्रेस | तिवसा | 339 |
8 | बच्चू कडू ( मंत्री, जून 2022 पर्यंत) | प्रहार जनशक्ती | अचलपूर | 13 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत अमरावती जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- रोहणखेडा-पर्वतापूर येथील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन करण्याबाबत
- अमरावती विभागातील महादेव कोळी आदिवासींकडून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्याची मागणी
- अचलपूर येथील अण्णाभाऊ साठे दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर विकासकामे केली नसल्याबाबत
- अमरावतीतील अंजनगाव सुर्जी येथे संत्रा गळती व शंख अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत
- अचलपूर तालुक्यातील मौजे असदपूर येथील अंशतः बुडीत गावठाणातील घरे नवीन पुनर्वसित गावठाणात घेण्याबाबत
- पंतप्रधान आवास योजनेचे प्रलंबित अनुदान देण्याबाबत
- छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या शेतक-यांना कर्जमाफी देण्याबाबत,
- अवैध उत्खनन, रेती तस्करी, रस्ते दुरुस्ती, बेकायदेशीर गुटखा विक्री तसेच जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्पासंबंधीत प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत.