गायीच्या पोटातले काकरव

तंतुमय गवत, वैरण आणि वनस्पतींची पाने गाय खाऊ शकते. गायींना शिजवलेले अन्न, विशेषतः माणसांच्या सेवनासाठी तयार केलेले अन्न खाऊ घातल्यास त्यांच्या पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळं गायीच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. गायींना शिजवलेलं अन्न खायला देऊ नये. नैवेद्य म्हणून आपण गायीला पुरणपोळी किंवा शिजवलेलं आणि तळलेलं अन्न देतो, त्याचे अनेक दुष्परिणाम गायीवर होतात.
[gspeech type=button]

तिचं नाव दीपज्योति. ही नववत्सा पंतप्रधानांच्या घरी जन्मली. त्यामुळे तिचं देशभर कोण कौतुक झालं. पंतप्रधानांच्या निवासातल्या गोठ्यातील पुंगनूर जातीच्या गायीची ही कालवड. तिच्या मस्तकावर ज्योतीप्रमाणं सफेद खूण आहे. अर्थातच हा शुभशकुन समजून मोदीजींनी तिचं नाव ‘दीपज्योति’ ठेवलं. एकूणच मंगलमय वातावरणात या नववत्सेचं कौतुक विविध पदार्थांचा घास देऊन झालं यात नवल नाही.

आपण एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणतो. गोग्रास म्हणून घरातल्या पहिल्या पोळीचा घास गायीसाठी ठेवला जातो. हल्ली तर थाटामाटात गायीचं डोहाळे जेवण करण्याची पद्धत सुरू झाली आहे. गायीला अकरा प्रकारचे पदार्थ खायला दिले जातात. शिजवलेलं अन्न बिचाऱ्या गायीच्या पोटी ढकललं जातं. सध्या पितृपक्ष सुरू आहे. अनेकजण पितरांना जेवण पोहचावं म्हणून कावळ्याला जेवणाचं पान ठेवतात. कावळ्यानं यातील काहीही पदार्थ खाल्ला की गायीला पुरणपोळीपासून ते कुरडया, भजी वगैरे तळलेले पदार्थही प्रेमाने खाऊ घालतात.

गाय हा उपयुक्त पशु आहे असं सावरकरांनी जरी सांगितलेलं असलं, तरी भारतीयांची श्रद्धा आहे की गायीच्या पोटात ३३ कोटी देवांचा अधिवास असतो. पण त्या गायीच्या पोटाचा आणि तिथे वसलेल्या देवतांचाही भारतीय लोक फारसा विचार करत नाही. मग गायीच्या पोटातल्या ‘काकरवा’चा विचार कोण करणार?

गायींचे पोट हे माणसांचे शिजवलेले अन्न खाण्यासाठी अनुकूल नाही. गाय हा रवंथ करणारा प्राणी आहे. गोपालन हा भारतीय परंपरेतला खूप जुना व्यवसाय आहे. पूर्वी जंगलाच्या कडेच्या कुरणांमध्ये गायी चरायला घेऊन जायचे. तिथे हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्याची भीती असायची. अशावेळी या खूरवाल्या प्राण्यांची पाचनप्रणाली अशी विकसित झाली की, भराभर गवत किंवा वनस्पतींच्या पानाचे तुकडे पोटात भरून घ्यायचे आणि गोठ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी आल्यावर पोटात घाईघाईत ढकलेलं गवत, वैरण पुन्हा पोटातून तोंडात घेऊन रवंथ करत ते पाचनयोग्य बनवायचं.

तंतुमय गवत, वैरण आणि वनस्पतींची पाने गाय खाऊ शकते. गायींना शिजवलेले अन्न, विशेषतः माणसांच्या सेवनासाठी तयार केलेले अन्न खाऊ घातल्यास त्यांच्या पचनावर परिणाम होऊ शकतो. यामुळं गायीच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. गायींना शिजवलेलं अन्न खायला देऊ नये. नैवेद्य म्हणून आपण गायीला पुरणपोळी किंवा शिजवलेलं आणि तळलेलं अन्न देतो, त्याचे अनेक दुष्परिणाम गायीवर होतात.

गायी रवंथ करणाऱ्या प्राण्यांमध्ये मोडतात. गायींचे दात वैरण चावून चघळण्यासाठी योग्य असतात. त्यांना तीक्ष्ण दात नसतात. त्यांच्या पोटाचे चार कप्पे असतात. रुमेन, रेटिक्युलम, ओमासम आणि एबोमासम. पहिल्या दोन कप्प्यांमध्ये असलेले सिम्बायोटिक जिवाणू आणि प्रोटिस्ट्स सेल्युलोज पचवतात. इथे ग्लुकोजचं विभाजन होतं. जिवाणू चयापचय क्रियेदरम्यान फॅटी अॅसिड तयार करतात. एक ऊर्जा स्रोत म्हणून हे काम करतं. अन्न सुरुवातीला गिळल्यानंतर, पुढील पचनासाठी गायी ते पुन्हा अन्ननलिकेमधून उलट तोंडामध्ये आणतात करतात आणि पुन्हा हे गवत चघळलं जातं. त्याला रवंथ किंवा चर्वण करणे म्हणतात. तिथे ते लाळेत मिसळून विकरांच्या मार्फत विभाजित होतं. तिथून चर्वण केलेल्या गवताचा प्रवास पुन्हा पोटाकडे सुरू होतो. पोटातल्या चार कप्प्यांमध्ये कठीण तंतुमय वनस्पती किण्वन प्रक्रियेने पचवण्यास मदत होते. त्यांच्या पोटातील सूक्ष्मजीव वनस्पतींमध्ये असलेले सेल्युलोज ( जटिल कार्बोहायड्रेट) पचवण्यासाठी मदत करतात.

मात्र शिजवलेले अन्न जर गायीने खाल्ले तर गायीच्या पोटातली तंतुमय रचना बदलते. त्यातले पोषक घटक बदलतात. गायीच्या पोटातल्या रुमेन या कप्प्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांच्या किण्वन प्रक्रियेत अडथळा येतो. माणसांसाठी शिजवलेल्या अन्नात मीठ, साखर, तेल आणि मसाले असतात. हे घटक गायींसाठी योग्य नसतात. अपचन किंवा पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात. मैद्याचे किंवा तळलेले अन्न दिल्याने रुमेन कप्प्यातली पीएच लेवल बिघडते आणि गायीला पचनाचे विकार जडू शकतात.

गायींना प्रामुख्याने कच्चे गवत, वैरण, सिलेज आणि वनस्पतींवर आधारित चारा दिला पाहिजे. काही शेतकरी त्यांच्या आहारात धान्य किंवा विशेष फॉर्म्युलेटेड खाद्य देतात, परंतु ते देखील कच्चे किंवा कमी प्रक्रिया केलेले असते. थोडक्यात, गायींना काही शिजवलेले अन्न खाणे शारीरिकदृष्ट्या शक्य असले तरी, ते त्यांच्या आरोग्यासाठी चुकीचे आहे. त्यांची पाचन व्यवस्था गवतासाठी योग्य आहे, मात्र शिजवलेल्या किंवा प्रक्रिया केलेल्या अन्नासाठी नाही.

गायीचा नैवेद्य हा श्रद्धेचा विषय असल्याने आणि काहीवेळा अतिप्रेमाने गायींना शिजवलेलं अन्न खाऊ घातलं जातं. ते जितकं हानिकारक तितकंच मांजरांना दूध पाजणंही हानिकारक. मांजरांमध्ये लॅक्टोस इनटॉलरन्स असतो. नागपंचमीला सापाला दिलेलं दूधही चुकीचंच. कारण नागांचं शरीर दूध पिण्यासाठी बनलेलंच नसतं. आपण आपल्या भवतालात वावरणाऱ्या प्राण्यांच्या खाद्याचं भान मिळवायला हवं. बळजबरीने त्यांना मानवी अन्न खायला घालणं चुकीचं आहे.

या प्राण्यांच्या खाद्याचा आणि आरोग्याचा विचार आपण करावा यासाठीच बहुधा दीपज्योतिचं आगमन झालंय. दीपज्योति श्रेष्ठाघरची गाय आहे. पण दीपज्योतिच्या निमित्ताने प्राणीजीवनाची कदर आपण करायला लागलो, तरी या नववत्सेचं खरं स्वागत झालं असं म्हणता येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ