‘गेम चेंजर’ वाढवण बंदराला मच्छीमारांचा विरोध कायम

वाढवण बंदराला विरोध दर्शवमारे मच्छिमार बांधव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आज दुपारी एक वाजता मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला मच्छिमार बांधवांकडून विरोध दर्शवला जात आहे. विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल, तर ते कदापी सहन केलं जाणार नाही. अशा विध्वंसक प्रकल्पांना शेवटपर्यंत कडाडून विरोध करणार असल्याचं मत मच्छीमार संघटनांकडून नोंदवलं जात आहे.
[gspeech type=button]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या वाढवण बंदराचे भूमिपूजन आज दुपारी एक वाजता मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. या बंदराला 76 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे दोन लाख युवकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, या बंदरामुळे पर्यावरणाची हानी होणार आहे तसेच मासेमारी धोक्यात येणार असल्याचा आरोप करीत मच्छीमारांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

मच्छीमार नाराज

वाढवण बंदराच्या निषेधार्थ राज्यातील मच्छीमार संघटना आज कडाडून विरोध करणार आहेत. उत्तन, भाईंदर येथे झालेल्या अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घएतला आहे. युवा अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी याबाबतची माहिती दिली. वाढवण बंदर उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील 60 पेक्षा जास्त मच्छीमार गावांवर विपरीत परिणाम होणार असून लाखो मच्छीमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत. “मच्छीमार समाज आजतागायत कधीच विकासाच्या आड आला नाही, पण विकासाच्या नावाखाली मच्छीमारांचा व्यवसाय नष्ट होत असेल, तर ते कदापी सहन केलं जाणार नाही. अशा विध्वंसक प्रकल्पांना शेवटपर्यंत कडाडून विरोध करणार,” असं समितीचे सरचिटणीस संजय कोळी यांनी सांगितलं.

वसई तहसील कार्यालयावर मोर्चा

या प्रकल्पामुळे फक्त डहाणू तालुक्यातील मच्छीमार बाधित होणार नसून मुंबई, ठाणे, उत्तन, वसई, अर्नाळा, सातपाटी इथले मासेमारी व्यवसाय सुद्धा बाधित होणार आहे. समुद्रातील एकूण 30 हजार एकर क्षेत्र मासेमारीसाठी प्रतिबंधित करण्यात येणार, असं भारतीय मत्स्यकी संशोधन संस्थेच्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलं आहे. त्यामुळे या प्रकल्पाला राज्यातील सर्व किनारपट्टीवरून विरोध केला जात आहे, असं समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी सांगितलं.

वाढवण किनाऱ्यावर सरकारची प्रेत यात्रा आंदोलन आयोजित केलं आहे. तर वसईमध्ये या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या विरोधात तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलं आहे.

1 Comment

  • TestUser

    AwjrIu aIzo vebA

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ