ज्ञान साधक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

"शिका, संघर्ष करा, संघटित व्हा” – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्रिसूत्री घोषवाक्य आजही तितकंच प्रभावी आणि दिशा दाखवणारं वाटतं. त्यांनी शिक्षणाला केवळ नोकरी मिळवण्याचं साधन मानलं नाही, तर अन्यायाविरोधात लढण्याचं आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचं प्रभावी शस्त्र मानलं. आजच्या काळात शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेलं खासगीकरण, जातीवर आधारित भेदभाव आणि तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली डिजिटल दरी लक्षात घेतल्यास – बाबासाहेबांचे विचार नव्याने समजून घेण्याची नितांत गरज आहे.
[gspeech type=button]

डॉ. आंबेडकरांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचं आणि वंचित घटकांना सक्षम बनवण्याचं सर्वात प्रभावी साधन आहे. त्यांच्या दृष्टिकोनात शिक्षण म्हणजे केवळ वैयक्तिक उन्नती नव्हे, तर तो एक मूलभूत हक्क होता – जो जातिनिहाय शोषण आणि विषमता तोडण्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यांनी आपल्या शिक्षणासाठी आणि इतर वंचित समाजघटकांसाठी शिक्षणाच्या समान संधी मिळवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आजही, जेव्हा आपण शिक्षणाचा हक्क, विद्यार्थी आंदोलनं, खासगीकरण, आणि डिजिटल दरी यासारखे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करतो – तेव्हा बाबासाहेबांचे विचार मार्गदर्शक ठरतात.

ज्ञान संपत्तीसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा

1945 मध्ये कलकत्त्यातील ‘स्टुडंट्स हॉल’मध्ये दिलेल्या भाषणात डॉ आंबेडकरांनी सांगितलं होतं की, फक्त पदव्या मिळवण्यात काही अर्थ नाही; तर खरी, उपयोगी, आणि मूलगामी ज्ञानसंपत्ती (Sterling Knowledge) मिळवणं महत्त्वाचं आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सावध केलं होतं की, अभ्यास गांभीर्याने घ्या, आणि खऱ्या अर्थाने विचार करण्याची सवय लावा. शिक्षणाची गुणवत्ता का घसरते यावर भाष्य करताना, त्यांनी निरीक्षण मांडलं होतं की अनेक विद्यार्थी अभ्यासाऐवजी राजकारणात अधिक गुंततात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या राजकीय संघटनांवर – विशेषतः ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनवर – टीका केली होती की त्या संघटना स्वतंत्र विचार न करता राजकीय पक्षांची भाषा बोलतात. मात्र, ही टीका विद्यार्थ्यांच्या चळवळीवर नव्हती – तर त्यांच्या ऊर्जेचा वापर पक्षीय राजकारणाऐवजी समता आणि सशक्तीकरणासाठी व्हावा, अशी त्यांची भूमिका होती.

 

 

विद्यार्थी चळवळी राजकीय अजेंड्यासाठी वापरतात, याबद्दल खंत

त्याच भाषणात आंबेडकरांनी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वतंत्र विद्यार्थी संघटना स्थापन करावी असं सुचवलं. यामागे वेगळेपणा ठेवण्याचा हेतू नव्हता, तर वंचित विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणं हा उद्देश होता – जसं की शिष्यवृत्ती मिळण्यात येणाऱ्या अडचणी, खासगी संस्थांमधील भेदभाव, आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव. त्यांचं मत होतं की गरीब आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना श्रीमंत विद्यार्थ्यांसारखं वागवलं जातं, पण त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत. त्यांनी सूचवलं की, अशा संघटनेचा वापर पुरावे गोळा करून धोरणं बदलण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी केला जाऊ शकतो. पण आज पाहता, अनेक विद्यार्थी चळवळी राजकीय अजेंड्यांसाठी वापरल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या मूळ समस्या दुर्लक्षित राहतात, याची खंत वाटते. 

हेही वाचा – सामाजिक समतेचा मूलमंत्र हा शैक्षणिक क्रांतीतूनच – डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार

 

शिक्षणाला महत्व देण्याचा सल्ला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षणविषयक विचार हे केवळ तात्त्विक नव्हते, तर ते वंचित समाजाच्या प्रत्यक्ष जीवनातून आलेले होते. 1939 साली चेंबूरच्या सफाई कामगारांच्या एका सभेत त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं, “तुमचं संपूर्ण आयुष्य या गलिच्छतेत जात आहे. पण, इथे उपस्थित प्रत्येकाने ठरवावं की तुमची मुलं तरी या हालअपेष्टांपासून मुक्त झाली पाहिजेत. तुमच्या मुलांनी शिकून तुमच्याहून अधिक सुसंस्कृत, सुखी आणि माणुसकीचं आयुष्य जगलं पाहिजे.” यातून डॉ. आंबेडकरांचा शिक्षणावरील दृढ विश्वासाबरोबरच, वंशानुगत व्यवसायाच्या साखळीला तोडण्याचा कटाक्षही दिसून येतो. डॉ. आंबेडकरांचा हाच सल्ला नंतरच्या काळात वंचित समुहाने गांभीर्याने घेतलेला आपल्याला दिसतो. यामुळेच कधीकाळी माणूस म्हणूनही ज्यांना ओळख नव्हती, तो जातसमूह आज शिक्षणक्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करताना आपल्याला दिसतो.

 

 

ज्ञानाचा वापर व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी करावा

24 डिसेंबर 1952 रोजी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. आंबेडकर म्हणाले होते,  –”ज्ञान ही माणसाच्या आयुष्याची पायाभूत गोष्ट आहे, आणि विद्यार्थ्याची बौद्धिक वाढ टिकवण्यासाठी व त्याची बुद्धी जागृत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले गेले पाहिजेत.” त्यांनी याच स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले होते की, केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही; त्या ज्ञानाचा वापर विचार करण्यासाठी, व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी, आणि समाज परिवर्तनासाठी केला गेला पाहिजे.प्रश्न विचारणारे विद्यार्थी, युवक डॉ. आंबेडकरांना आवडायचे. ज्ञानसाधनेचा पुरस्कार डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर केला.

समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांच्या स्तरावरून मोजावी

1944 साली ‘मराठा’ मासिकात त्यांनी लिहिलं होतं – ज्ञान हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शक्तीशाली ठरते आहे.शिक्षण ही केवळ एक संधी नाही, तर आपल्या अस्तित्वासाठीची लढाई आहे, हे त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला स्पष्ट दिसतं. 1942 मध्ये नागपूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय दलित महिला परिषदेत त्यांनी ठामपणे सांगितलं होतं – एका समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिलांनी गाठलेल्या प्रगतीच्या स्तरावरून मोजतो. महिलांनी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि सर्वच स्तरातील महिलांना शिक्षण मिळाले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. महिलांनी हीनतेची भावना झटकून, आपल्या मुलांना शिकवावं, आणि स्वतःचं स्थान ठामपणे मिळवावं असे ते म्हणत. त्यांनी अनेकदा महिलांच्या स्वतंत्र परिषदा घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो.  

हेही वाचा – जातीयतेच्या मुळावर डॉ. आंबेडकरांनी कुऱ्हाड का चालवली?

केवळ प्रेरणा नाही, तर सामाजिक परिवर्तनासाठीची दिशा 

25 डिसेंबर 1946 रोजी नागपूरमध्ये भरलेल्या ‘अखिल भारतीय दलित वर्ग विद्यार्थी परिषदेत’ डॉ. आंबेडकरांनी केलेले मार्गदर्शन आजही अनेकांगाने महत्वाचे आहे. “आपल्या तरुणांनी दोन गोष्टी शिकल्या पाहिजेत – योग्य संधी मिळाल्यास आपण कोणालाही कमी नाही हे कृतीतून दाखवावं; आणि वैयक्तिक सुखाच्या मागे न लागता, आपल्या समाजाच्या सामूहिक सक्षमीकरणासाठी योगदान द्यावं.” प्रत्येक संधीचे सोने तरुणांना करता आले पाहिजे असा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता. स्वहितापेक्षा समाजहित महत्वाचे आहे असे त्यांनी वारंवार सांगितलेले आपल्याला दिसते. “शिका, संघर्ष करा, संघटित व्हा”– ही केवळ घोषणा नव्हती, तर सामाजिक परिवर्तनाचा एक संपूर्ण आराखडा होता. त्यांच्या मते, शिक्षणातून जागरूकता आली पाहिजे, आणि त्या जागरूकतेतून कृती झाली पाहिजे. आजही अनेक सामाजिक चळवळी, विशेषतः शिक्षणातील अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, या त्रिसूत्रीला आपला प्रेरणास्त्रोत मानून वाटचाल करत आहेत.

आज शिक्षणाचं खासगीकरण, शैक्षणिक खर्चातील वाढ, संस्थांमधील जातीय भेदभाव, आणि डिजिटल असमानता यांसारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करताना डॉ. आंबेडकरांचे  विचार आपल्याला अधिकच समृद्ध आणि तर्कसंगत वाटतात. त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनात समाविष्ट असलेला स्वाभिमान, ज्ञानसाधना आणि सामाजिक समतेची आस हीच आजच्या काळात दिशा दाखवू शकणारी खरी प्रेरणा आहे.

7 Comments

  • एस पी महाजन सर

    छान रवी लहान खेड्यापाड्यात वाढला तु अभिमान वाटतो आमच्या सारख्या शिक्षकाला खुप खुप छान लिखाण केलेस बाळासाहेबांवर असेच लिहित रहा सुंदर

  • एस पी महाजन सर

    छान रवी लहान खेड्यापाड्यात वाढला तु अभिमान वाटतो आमच्या सारख्या शिक्षकाला खुप खुप छान लिखाण केलेस बाळासाहेबांवर असेच लिहित रहा

    • Ravindra Nannavare

      The lesson which you taught in classroom that are playing very important role in life. Thank you so much sir for your contribution in my life.

  • Ravindra Nannavare

    Thank u you much Shreyash

  • Shreyash Kamble

    अत्यंत सखोल मांडणी आहे. खूप खूप अभिनंदन.

  • अभिजीत कोतोलीकर

    रवी अप्रतिम लिखाण खूप छान….👌👌👌👌आज आदरणीय बाबासाहेबांबद्दलचे विचार प्रत्येक युवकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहे…आज एक वेगळ्या पद्धतीने तू बाबासाहेब मांडेलस 👌👌👌

    • Ravindra Nannavare

      Thank you so much Abhijit.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

7 Responses

  1. रवी अप्रतिम लिखाण खूप छान….👌👌👌👌आज आदरणीय बाबासाहेबांबद्दलचे विचार प्रत्येक युवकांपर्यत पोहचविणे आवश्यक आहे…आज एक वेगळ्या पद्धतीने तू बाबासाहेब मांडेलस 👌👌👌

  2. अत्यंत सखोल मांडणी आहे. खूप खूप अभिनंदन.

  3. छान रवी लहान खेड्यापाड्यात वाढला तु अभिमान वाटतो आमच्या सारख्या शिक्षकाला खुप खुप छान लिखाण केलेस बाळासाहेबांवर असेच लिहित रहा

    1. The lesson which you taught in classroom that are playing very important role in life. Thank you so much sir for your contribution in my life.

  4. छान रवी लहान खेड्यापाड्यात वाढला तु अभिमान वाटतो आमच्या सारख्या शिक्षकाला खुप खुप छान लिखाण केलेस बाळासाहेबांवर असेच लिहित रहा सुंदर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ