VAC सिग्नल्सः बेंगळुरुमध्ये ए.आय. च्या मदतीने वाहतूक कोंडीची समस्या सोडवणार

VAC Signals : बेंगळुरूमध्ये वाढती वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. रस्त्यांवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रॅफिक जाम होणे सामान्य झालं आहे. यावर उपाय म्हणून, बेंगळुरू ट्रॅफिक पोलिस (BTP) आता शहरातील 100 हून अधिक प्रमुख चौकांवर नवीन VAC सिग्नल्स बसवणार आहेत.
[gspeech type=button]

बेंगळुरूमध्ये वाढती वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. रस्त्यांवरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ट्रॅफिक जाम होणे सामान्य झालं आहे. यावर उपाय म्हणून, बेंगळुरू ट्रॅफिक पोलिस (BTP) आता शहरातील 100 हून अधिक प्रमुख चौकांवर नवीन VAC सिग्नल्स बसवणार आहेत.

हे सिग्नल्स कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून वाहतूक स्मार्टपणे नियंत्रित करतात. यामुळे आता लोकांना कुठे जायचं असल्यास ट्रॅफिकमुळे उशीर होणार नाही ते वेळेत त्याठिकाणी पोहचू शकतील, अशी आशा लोक व्यक्त करत आहेत.

VAC सिग्नल्स म्हणजे काय आणि ते कसे मदत करू शकतात?

VAC सिग्नल म्हणजे एक स्मार्ट ट्राफिक सिग्नल सिस्टम आहे, यात ट्राफिकचा अंदाज घेऊन सिग्नल स्वतःच आपली वेळ बदलतात. साधारणपणे, रेग्युलर ट्राफिक सिग्नल्समध्ये लाल, हिरवा आणि पिवळा रंगात फीड केलेल्या वेळेवर बदल होत असतात.

किंवा ट्राफिक जाम कमी करण्यासाठी मॅन्युअली सिग्नल बदलावे लागतात. पण VAC सिग्नल्समध्ये एक स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. याद्वारे ट्राफिकची स्थिती पाहून सिग्नल्स वेळ स्वतःच ठरवते.

या सिस्टीमला Adaptive Traffic Control Systems (ATCS) म्हटलं जातं. यात एका सिग्नलला पुढील सिग्नल्सब‌द्दल माहिती देऊन त्या सिग्नलचा रंग बदलता येतो. म्हणजे, जर पुढच्या सिग्नलवर ट्राफिक जास्त असेल, तर पुढचा सिग्नल आपोआप वेळ वाढवून त्या वाहनांना अधिक वेळ देतो यामुळे ट्राफिक जाम होण्याची शक्यता कमी होते.

VAC सिग्नल्स जपानच्या इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) आणि त्यांच्या MODERATO टेक्नॉलॉजीच्या सहकार्याने डिझाइन केले गेले आहेत. ही सिस्टिम केंद्रीय वाहतूक व्यवस्थापन केंद्रातून कंट्रोल आणि मॉनिटर केली जाऊ शकते.

या सिग्नल्समध्ये AI-टेक्नॉलॉजी असलेले कॅमेरे असतात, जे ट्राफिकवर लक्ष ठेवतात. ते पाहतात की, कोणत्या रस्त्यावर जास्त वाहने आहेत आणि कोणत्या रस्त्यावर कमी. त्यानंतर कॅमेरामध्ये गोळा केलेली माहिती वापरून, Composite Signal Control Strategy (CoSiCoSt) नावाच्या सिस्टिमद्वारे सिग्नल्समध्ये योग्य बदल केला जातो. जर एका दिशेने जास्त वाहतूक असेल, तर दुसऱ्या दिशेतील वाहने थोडा जास्त वेळ थांबवली जातात.

ही सिस्टीम सतत वाहतूक मॉनिटर करते आणि योग्य सिग्नल वेळ सेट करते तसेच रिअल-टाइम GPS डेटा वापरून अधिक अचूकता मिळवते. विशेषतः भारतीय वाहतूक परिस्थिती आणि वाहनचालकांच्या सवयींचा विचार करून ही टेक्नॉलॉजी डिझाइन केली आहे.

बेंगळुरू ट्रॅफिक कंट्रोल (BTC) सिग्नल्समध्ये सुधारणा करण्यासाठी एक नवीन पद्धत लागू केली आहे, यामध्ये ग्रीन सिग्नल सुरु होण्यापूर्वी पाच सेकंदांचा काउंटडाउन दाखवला जाईल. यामुळे वाहनचालकांना सिग्नल बदलणार असल्याची पूर्वसूचना मिळेल आणि गोंधळ कमी होईल.

नवीन VAC सिग्नल्स तेव्हा चांगले काम करतात जेव्हा रस्त्यावर जास्त वाहने असतात. म्हणजे, ट्राफिक जास्त असल्यास, हे सिग्नल आपोआप वेळ वाढवून वाहतुकीला मदत करतात. पण, जर रस्त्यावर वाहने कमी असतील, तर काही वेळा ही प्रणाली गोंधळात टाकू शकते. कारण, कधीकधी एकाच रस्त्याला जास्त वेळ दिला जातो, त्यामुळे दुसऱ्या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांना थांबायला लागते.

AI आधारित सिग्नल्स साधारणपणे 90% वेळा स्वयंचलितपणे काम करतात. म्हणजेच, या सिग्नल्स ट्राफिकच्या परिस्थितीला ओळखून स्वतःच वेळ आणि मोड बदलतात. ते वाहतूक कोंडीच्यावेळी दोन वेगवेगळ्या मोड्स (VAC आणि ATCS) मध्ये स्विच करतात. VIP आणि ऍम्ब्युलन्ससाठी वाहतूक व्यवस्थापित करताना केवळ 5% फक्त मॅन्युअल हस्तक्षेपाची आवश्यकता असते,

बेंगळुरूमध्ये 100 पेक्षा जास्त चौकांवर हे सिग्नल लावले गेले आहेत आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. विशेषतः, ATCS सिग्नल असलेल्या 75 चौकांवरील वाहतूक कोंडी 33% कमी झाली आहे, असा अहवाल मिळाला आहे.

मार्च 2025 पर्यंत बेंगळुरूमध्ये आणखी 65 VAC सिग्नल्स लावले जाणार आहेत. पुढील टप्प्यात 300 रेग्युलर सिग्नल्स VAC सिग्नल्समध्ये रूपांतरित केले जातील. यामुळे ट्राफिक नियंत्रणात आणखी सुधारणा होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ