देशातील पहिला काचेचा पूल कन्याकुमारीत

India’s first glass bridge : कन्याकुमारीमध्ये भारतातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. या काचेच्या पुलाचा (Glass Bridge) वापर करून लोक आता विवेकानंद स्मारकापासून (Vivekananda Memorial) तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे.
[gspeech type=button]

कन्याकुमारीमध्ये भारतातील पहिला काचेचा पूल बांधण्यात आला आहे. या काचेच्या पुलाचा (Glass Bridge) वापर करून लोक आता विवेकानंद स्मारकापासून (Vivekananda Memorial) तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. या पुलामुळे लोकांना संपूर्ण सुरक्षिततेसह समुद्रातील एक  वेगळा अनुभव घेता येणार आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी, 30 डिसेंबर 2025 रोजी या पुलाचे उद्घाटन केले. तसचं त्यांनी या पुलाचा व्हिडिओ त्यांच्या X या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये पुलाचे सुंदर डिझाइन आणि आजूबाजूच्या परिसराचे मनमोहक दृश्य दिसते.

पुलाची वैशिष्ट्ये

हा काचेचा पूल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद आहे. तसचं पुलाची उंची समुद्रसपाटीपासून 133 फूट इतकी आहे.  या पुलावर पारदर्शक काच लावलेली असल्याने पर्यटकांना समुद्रातील थेट दृश्य पाहता येतील.  या बोस्ट्रिंग आर्च काचेच्या पुलाची रचना ही खारट वाऱ्यांना, उष्ण व दमट हवामानाला तोंड देण्यासाठी केली आहे.

खर्च आणि बांधकाम

37 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या पुलामुळे कन्याकुमारीला अधिक पर्यटक आकर्षित होतील. समुद्रावर चालण्याचा रोमांचक अनुभव आणि सुंदर दृश्यामुळे हा पूल देशभरातील आणि परदेशातील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरू शकेल.

पर्यटनाला चालना

पूर्वी पर्यटकांना विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लुवर पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी बोटींचा वापर करावा लागत होता. मात्र, आता या काचेच्या पुलामुळे दोन्ही स्मारकांना जोडणारा सुंदर आणि सोयीस्कर मार्ग तयार झाला आहे.  काचेच्या या नवीन पुलावरून चालताना पर्यटकांना समुद्रातील दृश्य थेट पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे. आत्ता पर्यटक दोन स्मारकांमध्ये आरामशीर चालत जाऊ शकतात यामुळे प्रवासाचा वेळही कमी झाला आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर

समुद्रावर बांधलेला हा काचेचा पूल ते तयार करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा काचेचा पूल मजबूत सागरी वाऱ्यांसह धोकादायक सागरी परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या या पुलावर पर्यटकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली गेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ